शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

अटलजी सुशासनाचेच प्रतीक

By admin | Updated: December 26, 2014 00:48 IST

विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चरित्रग्रंथाचे प्रकाशन नागपूर : विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले तर केवळ विकासाचा उपयोग होत नाही. अटलजींनी विकासाचा मंत्र दिला पण विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना व्हावा म्हणून योग्य सुशासन असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विचारधारेवरच आमचे काम सुरू आहे. अटलजी हे सुशासनाचेच सुयोग्य प्रतीक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भाजपतर्फे डॉ. नारायण खेकाळे लिखित आणि लाखे प्रकाशनाद्वारे प्रकाशित अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, डॉ. राजीव पोतदार, लेखक डॉ. नारायण आणि सुजाता खेकाळे, आ. आशिष देशमुख, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, बळवंतराव ढोबळे, आ. समीर मेघे, आ. मितेश भांगडिया, कल्पना पांडे, आ. सुधाकर कोहळे, अशोक मानकर, चंद्रकांत लाखे, प्रमोद पेंडके, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, अटलजींसोबतचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. जनसंघाचे लोक निवडून येत नव्हते आणि अनामत रक्कम जप्त होत होती त्या काळात अटलजींनी केलेल्याा कामामुळेच आज चांगले दिवस आले आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य राष्ट्राला समर्पित होते. भारतरत्न उपाधीने त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या विचारधारेवर विकास आणि सुशासन आणण्याचा प्रयत्न आपण सारेच करू या, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे उलगडणे एका पुस्तकात शक्य नाही. पंतप्रधान असताना त्यांनी राबविलेल्या संकल्पनांचा जगात सन्मान झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांनाही जगभर मान्यता मिळाली. पंतप्रधान सडक योजनेमुळे ३ लाख गावे जोडली गेली. त्यांच्यात सर्वसमावेशकता होती. त्यांच्या या पुस्तकाने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी लेखकाचे मनोगत त्यांची मुलगी डॉ. अपर्णा गाडे यांनी वाचून दाखविले. कार्यक्रमाचे आभार राजीव पोतदार यांनी मानले. याप्रसंगी विनोद वखरे यांनी पं. बच्छराज व्यास यांचे गीत सादर केले. प्रास्ताविकातून अटलजींच्या कार्यावर गिरीश व्यास यांनी प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)