शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

अटलजी सुशासनाचेच प्रतीक

By admin | Updated: December 26, 2014 00:48 IST

विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चरित्रग्रंथाचे प्रकाशन नागपूर : विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले तर केवळ विकासाचा उपयोग होत नाही. अटलजींनी विकासाचा मंत्र दिला पण विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना व्हावा म्हणून योग्य सुशासन असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विचारधारेवरच आमचे काम सुरू आहे. अटलजी हे सुशासनाचेच सुयोग्य प्रतीक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भाजपतर्फे डॉ. नारायण खेकाळे लिखित आणि लाखे प्रकाशनाद्वारे प्रकाशित अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, डॉ. राजीव पोतदार, लेखक डॉ. नारायण आणि सुजाता खेकाळे, आ. आशिष देशमुख, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, बळवंतराव ढोबळे, आ. समीर मेघे, आ. मितेश भांगडिया, कल्पना पांडे, आ. सुधाकर कोहळे, अशोक मानकर, चंद्रकांत लाखे, प्रमोद पेंडके, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, अटलजींसोबतचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. जनसंघाचे लोक निवडून येत नव्हते आणि अनामत रक्कम जप्त होत होती त्या काळात अटलजींनी केलेल्याा कामामुळेच आज चांगले दिवस आले आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य राष्ट्राला समर्पित होते. भारतरत्न उपाधीने त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या विचारधारेवर विकास आणि सुशासन आणण्याचा प्रयत्न आपण सारेच करू या, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे उलगडणे एका पुस्तकात शक्य नाही. पंतप्रधान असताना त्यांनी राबविलेल्या संकल्पनांचा जगात सन्मान झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांनाही जगभर मान्यता मिळाली. पंतप्रधान सडक योजनेमुळे ३ लाख गावे जोडली गेली. त्यांच्यात सर्वसमावेशकता होती. त्यांच्या या पुस्तकाने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी लेखकाचे मनोगत त्यांची मुलगी डॉ. अपर्णा गाडे यांनी वाचून दाखविले. कार्यक्रमाचे आभार राजीव पोतदार यांनी मानले. याप्रसंगी विनोद वखरे यांनी पं. बच्छराज व्यास यांचे गीत सादर केले. प्रास्ताविकातून अटलजींच्या कार्यावर गिरीश व्यास यांनी प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)