शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

अटलजी सुशासनाचेच प्रतीक

By admin | Updated: December 26, 2014 00:48 IST

विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चरित्रग्रंथाचे प्रकाशन नागपूर : विकास आणि सुशासन यात फरक आहे. विकासाचा देखावा निर्माण केला जाऊ शकतो पण त्याचा उपयोग सामान्य माणसांना व्हावा म्हणून योग्य प्रशासन असले पाहिजे. योग्य नियोजन नसले तर केवळ विकासाचा उपयोग होत नाही. अटलजींनी विकासाचा मंत्र दिला पण विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना व्हावा म्हणून योग्य सुशासन असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विचारधारेवरच आमचे काम सुरू आहे. अटलजी हे सुशासनाचेच सुयोग्य प्रतीक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्यक्त केले. भाजपतर्फे डॉ. नारायण खेकाळे लिखित आणि लाखे प्रकाशनाद्वारे प्रकाशित अटलबिहारी वाजपेयी यांच्या चरित्रग्रंथाचे लोकार्पण डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, डॉ. राजीव पोतदार, लेखक डॉ. नारायण आणि सुजाता खेकाळे, आ. आशिष देशमुख, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, बळवंतराव ढोबळे, आ. समीर मेघे, आ. मितेश भांगडिया, कल्पना पांडे, आ. सुधाकर कोहळे, अशोक मानकर, चंद्रकांत लाखे, प्रमोद पेंडके, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, अटलजींसोबतचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. जनसंघाचे लोक निवडून येत नव्हते आणि अनामत रक्कम जप्त होत होती त्या काळात अटलजींनी केलेल्याा कामामुळेच आज चांगले दिवस आले आहेत. त्यांचे प्रत्येक कार्य राष्ट्राला समर्पित होते. भारतरत्न उपाधीने त्यांचा सन्मान झाला. त्यांच्या विचारधारेवर विकास आणि सुशासन आणण्याचा प्रयत्न आपण सारेच करू या, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे उलगडणे एका पुस्तकात शक्य नाही. पंतप्रधान असताना त्यांनी राबविलेल्या संकल्पनांचा जगात सन्मान झाला. त्यांनी केलेल्या आर्थिक आणि पायाभूत सुविधांनाही जगभर मान्यता मिळाली. पंतप्रधान सडक योजनेमुळे ३ लाख गावे जोडली गेली. त्यांच्यात सर्वसमावेशकता होती. त्यांच्या या पुस्तकाने नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी लेखकाचे मनोगत त्यांची मुलगी डॉ. अपर्णा गाडे यांनी वाचून दाखविले. कार्यक्रमाचे आभार राजीव पोतदार यांनी मानले. याप्रसंगी विनोद वखरे यांनी पं. बच्छराज व्यास यांचे गीत सादर केले. प्रास्ताविकातून अटलजींच्या कार्यावर गिरीश व्यास यांनी प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)