शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी घरी जाताच एकाने त्या भाजीत विषारी द्रव्य मिसळविले. ही बाब लक्षात येताच सर्व जण जेवण न करता निघून गेले. मात्र, ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच प्रकरण पाेलिसात पाेहाेचले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलापूर (ता. नरखेड) शिवारात २५ डिसेंबर २०१३ राेजी घडली असून, पाेलिसांनी पसार झालेल्या आराेपीस सात वर्षांनी अर्थात बुधवारी (दि. १०) नागपूर शहरातून अटक केली.

नीलेश धनराज नारनवरे (३२, रा. पिलापूर, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नीलेशचा हरविलेला माेबाईल देवीदास महादेव नारनवरे, रा. पिलापूर याला सापडल्याने ताे परत देण्यासाठी देवीदास व अन्य तीन मित्रांनी नीलेशला पार्टी मागितली हाेती. नीलेशने हाेकार दिल्याने २५ डिसेंबर २०१३ च्या रात्री पिलापूर शिवारातील दिदावत यांच्या शेतात मटनाची पार्टी आयाेजित केली हाेती.

भाजी तयार केल्यानंतर नीलेश शेतात थांबला तर अन्य चाैघे पाेळ्या आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते परत आले असता, त्यांना नीलेश भाजीत काहीतरी मिसळत असल्याचे चाैघांच्याही निदर्शनास आले. त्यांनी विचारणा करताच नीलेश तिथून पळून गेला. त्यामुळे चाैघांनी जेवण न करता ती भाजी फेकून दिली. दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर २०१३) ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे देवीदास नारनवरे याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३२८, ३०७, १२० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.

...

नागपुरातून घेतले ताब्यात

आराेपी नीलेशला अटक करण्यासाठी पाेलीस प्रशासनाने ‘फरार आरोपी पाहिजेत’ या अभियानांतर्गत राेख बक्षीस जाहीर केले हाेते. दरम्यान, ताे नागपूर शहरातील अवस्थीनगर, सादिकाबाद भागात असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना मिळाली हाेती. नरखेड पाेलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचून आराेपी नीलेशला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या पथकात हरिश्चंद्र गावडे यांच्यासह मनीष सोनोने, कैलास उईके, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर व नीतेश पुसाम या पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. हे सर्व जण राेख बक्षिसाचे मानकरी ठरले.