शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

मित्रांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : हरविलेला माेबाईल सापडल्यानंतर ताे परत करण्यासाठी शेतात पार्टीचे आयाेजन करण्यात आले. मित्र पाेळ्या आणण्यासाठी घरी जाताच एकाने त्या भाजीत विषारी द्रव्य मिसळविले. ही बाब लक्षात येताच सर्व जण जेवण न करता निघून गेले. मात्र, ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच प्रकरण पाेलिसात पाेहाेचले. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलापूर (ता. नरखेड) शिवारात २५ डिसेंबर २०१३ राेजी घडली असून, पाेलिसांनी पसार झालेल्या आराेपीस सात वर्षांनी अर्थात बुधवारी (दि. १०) नागपूर शहरातून अटक केली.

नीलेश धनराज नारनवरे (३२, रा. पिलापूर, ता. नरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नीलेशचा हरविलेला माेबाईल देवीदास महादेव नारनवरे, रा. पिलापूर याला सापडल्याने ताे परत देण्यासाठी देवीदास व अन्य तीन मित्रांनी नीलेशला पार्टी मागितली हाेती. नीलेशने हाेकार दिल्याने २५ डिसेंबर २०१३ च्या रात्री पिलापूर शिवारातील दिदावत यांच्या शेतात मटनाची पार्टी आयाेजित केली हाेती.

भाजी तयार केल्यानंतर नीलेश शेतात थांबला तर अन्य चाैघे पाेळ्या आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. ते परत आले असता, त्यांना नीलेश भाजीत काहीतरी मिसळत असल्याचे चाैघांच्याही निदर्शनास आले. त्यांनी विचारणा करताच नीलेश तिथून पळून गेला. त्यामुळे चाैघांनी जेवण न करता ती भाजी फेकून दिली. दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर २०१३) ती भाजी खाल्ल्याने दाेन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे देवीदास नारनवरे याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंवि ३२८, ३०७, १२० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला.

...

नागपुरातून घेतले ताब्यात

आराेपी नीलेशला अटक करण्यासाठी पाेलीस प्रशासनाने ‘फरार आरोपी पाहिजेत’ या अभियानांतर्गत राेख बक्षीस जाहीर केले हाेते. दरम्यान, ताे नागपूर शहरातील अवस्थीनगर, सादिकाबाद भागात असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांना मिळाली हाेती. नरखेड पाेलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचून आराेपी नीलेशला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या पथकात हरिश्चंद्र गावडे यांच्यासह मनीष सोनोने, कैलास उईके, दिगांबर राठोड, राजकुमार सातुर व नीतेश पुसाम या पाेलीस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता. हे सर्व जण राेख बक्षिसाचे मानकरी ठरले.