शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

विद्यापीठात सेवानिवृत्तांची फौज

By admin | Updated: April 18, 2015 02:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अद्याप शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती न झाल्याने विविध विभागांवर प्रचंड ताण आलेला आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अद्याप शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती न झाल्याने विविध विभागांवर प्रचंड ताण आलेला आहे. यामुळे परीक्षा विभागाच्या कामावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. पदभरती करण्याचे सोडून विद्यापीठाने यावर वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची प्रशासन सेवा घेणार आहे. यासंदर्भात त्यांना पत्रदेखील देण्यात आले असून काही अधिकारी रुजूदेखील झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सद्यस्थितीत विद्यापीठाचा परीक्षा विभाग पूर्णपणे ढासळला आहे. खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ही बाब मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. २०१२ पासून सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रच मिळालेले नाही. अशा स्थितीत पदवी प्रमाणपत्राचे नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करणे ही परीक्षा विभागासमोरील कसरत ठरणार आहे. या कामासाठी सध्याचे अधिकारी लावले तर परीक्षांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रशासनाने सेवानिवृत्त व सक्षम अधिकाऱ्यांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १० ते १२ सेवानिवृत्त कर्मचारी परीक्षा भवनात विविध आघाड्यांवर मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष कामदेखील करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी) पदभरती हाच उपायविद्यापीठाच्या महत्त्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. विद्यापीठात अनेक कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी दिली तर ते चांगल्या पद्धतीने कामदेखील करू शकतात व त्यांना अनुभवदेखील मिळू शकतो. परंतु अगोदरच त्यांच्यावर मोठा ताण असल्याने ते या मोठ्या अनुभवाला मुकत आहेत. शिवाय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनावरदेखील मोठी रक्कम खर्च होणार आहे. याचा ताण विद्यापीठाच्या जनरल फंडावर पडणार आहे. रिक्त पदे भरणे हाच यावर उपाय असल्याचे मत एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.निवडणुकादेखील सेवानिवृत्तांच्याच मार्गदर्शनातविद्यापीठातील विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणुका होणार आहेत. याकरिता विद्यापीठाला अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. या निवडणुकांसाठी सहायक म्हणून विद्यापीठातील लोकांना संधी न देता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवा घेण्यात येणार आहे. याकरिता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांचे निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव व सहायक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव (सा.प्र.) व उपकुलसचिव (विद्या शाखा) हे काम पाहणार आहेत. परंतु निवडणुकांची वास्तविक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे व माजी उपकुलसचिव श्रीकृष्ण भारंबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, यादी तयार करणे इत्यादी निवडणुकींशी संबंधित कामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत.