शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक : नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

नागपूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. ...

नागपूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये यावर्षी चार लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात जून, जुलै या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतामध्ये तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले शेतीचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना कंपनीच्या नियमानुसार मोबाइल नोंदणी आणि कंपनीला कळवण्याची त्रासदायक अट होती. नेटवर्क प्रॉब्लेम व इतर अडचणींमुळे ते करणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते त्यामुळे ते पीकविमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाने पीकविमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक लावून पिकांच्या नुकसानीच्या सहा पर्यायांच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची तरतूद आता केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

...

हे आहेत नवीन सहा पर्याय

1) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येऊ शकतो.

2) शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीककर्ज मिळवले आहे, त्या बँकेतही परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करू शकतो. शेतकऱ्यांना वरील दोन्ही पर्याय किचकट वाटत असतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात शेतकरी आपल्या नुकसानीचा प्रस्ताव दाखल करू शकतो.

3) विमा कंपनीच्या नागपूर शहरातील कार्यालयातही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

5) विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून नुकसानीची माहिती दिली जाऊ शकते.

6) विमा कंपनीच्या नागपूर जिल्ह्यात असलेल्या कार्यालयाच्या ई-मेलवरही ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो.

.....

अडीच लाख हजार हेक्टरवरील पिके बाधित

जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात सरासरी अडीच लाख क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे कृषी व महसूल विभागाकडून अहवालात नमूद करण्यात आले आहे.

...

कोट

शेतातील नुकसानीच्या नोंदीसाठी मोबाइल ॲपवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहा सुविधा पर्याय दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी.

- मिलिंद शिंदे, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, नागपूर

...