शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक : नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

नागपूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. ...

नागपूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासांत कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये यावर्षी चार लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात जून, जुलै या महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतामध्ये तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले शेतीचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना कंपनीच्या नियमानुसार मोबाइल नोंदणी आणि कंपनीला कळवण्याची त्रासदायक अट होती. नेटवर्क प्रॉब्लेम व इतर अडचणींमुळे ते करणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते त्यामुळे ते पीकविमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाने पीकविमा कंपनीच्या मनमानीला ब्रेक लावून पिकांच्या नुकसानीच्या सहा पर्यायांच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची तरतूद आता केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

...

हे आहेत नवीन सहा पर्याय

1) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येऊ शकतो.

2) शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीककर्ज मिळवले आहे, त्या बँकेतही परिपूर्ण कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करू शकतो. शेतकऱ्यांना वरील दोन्ही पर्याय किचकट वाटत असतील तर आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात शेतकरी आपल्या नुकसानीचा प्रस्ताव दाखल करू शकतो.

3) विमा कंपनीच्या नागपूर शहरातील कार्यालयातही ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

5) विमा कंपनीने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून नुकसानीची माहिती दिली जाऊ शकते.

6) विमा कंपनीच्या नागपूर जिल्ह्यात असलेल्या कार्यालयाच्या ई-मेलवरही ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो.

.....

अडीच लाख हजार हेक्टरवरील पिके बाधित

जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात सरासरी अडीच लाख क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे कृषी व महसूल विभागाकडून अहवालात नमूद करण्यात आले आहे.

...

कोट

शेतातील नुकसानीच्या नोंदीसाठी मोबाइल ॲपवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहा सुविधा पर्याय दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी.

- मिलिंद शिंदे, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, नागपूर

...