शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

एपीजे अब्दुल कलाम हे आधुनिक ऋषीच

By admin | Updated: August 9, 2015 02:45 IST

नित्य जीवनात ज्ञान साधना करणारे, प्रचंड विद्वान तरी कमालीचे विनम्र, सतत काहीतरी शिकणारे ...

सलाम टू कलाम : सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन नागपूर : नित्य जीवनात ज्ञान साधना करणारे, प्रचंड विद्वान तरी कमालीचे विनम्र, सतत काहीतरी शिकणारे आणि आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा, यासाठी सातत्याने झटणारे नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थाने आधुनिक ऋषी होते. त्यामुळे त्यांचे गुण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विज्ञान भारती आणि प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेट्री यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडले सभागृह येथे ‘सलाम टू कलाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, डॉ. शंकर तत्त्ववादी, व्हीएनआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, सुरेश शर्मा, डॉ. ए.के. क्रांती आणि संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मोहन भागवत म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषिमुनी होऊन गेलेत. ते जंगलात राहायचे. ते प्रचंड ज्ञानी होते. सतत ज्ञानसाधना करायचे. नवीन पिढीला मार्गदर्शन करायचे, असे आपण ऐकले आहे. त्यांना आपण पाहिले नाही. परंतु हे सर्व गुण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यात ठासून भरले होते. सतत काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची जिद्द होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी केवळ आपल्यापुरता मर्यादित ठेवला नाही. तर त्यांनी ते ज्ञान नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शेवटपर्यंत केले. आपण एखाद्या राष्ट्रपतीसोबत बसलो आहोत, असे वाटतच नव्हते. इतकी विनम्रता त्यांच्यात असल्याचेही त्यांनी सांगितली. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांनी भद्रावती येथील आॅर्डनन्स कंपनी स्थलांतरित होण्यापासून वाचवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. सतीश वटे, डॉ. शंकर तत्त्ववादी, भरतभूषण जोशी, मिथिलेश तिवारी यांनी डॉ. कलाम यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. श्रीराम ज्योतिषी यांनी तर संचालन डॉ. पराग निमिषे यांनी केले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनीही वाहिली आदरांजली हर्ष गोलाईत या नेत्रहीन बालकाने ब्रेल लिपीच्या साहाय्याने तर राजाकुमार झा याने कवितेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. क्षितिज महाजन व बिलवा खापर्डे या विद्यार्थ्यांनीही आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी विज्ञान भारतीच्या ‘क्या अग्निपंख थम गये?’ या स्मरणिकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.