शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

‘रिफंड’साठी रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. परंतु तिकिटाची रक्कम परत घेण्यासाठी ...

नागपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक प्रवासी आपले तिकीट रद्द करीत आहेत. परंतु तिकिटाची रक्कम परत घेण्यासाठी (रिफंड) त्यांना मनस्ताप होत आहे. रेल्वेजवळ पैसे उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना दुसऱ्या रेल्वेस्थानकावर पाठविण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असल्याची स्थिती आहे.

इतवारी रेल्वेस्थानकावर गुरुवारी प्रवाशाला पैसे उपलब्ध नसल्याचे सांगून नागपूर रेल्वेस्थानकावर जाण्यास सांगण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावरही पैसे मिळत नव्हते. अर्ध्या तासानंतर दुसऱ्या काऊंटरवरून त्यांना पैसे देण्यात आले. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण करणे सुरू केले. परंतु अचानक पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवासी आपली तिकिटे रद्द करीत आहेत. परंतु पैशासाठी त्यांना एका रेल्वेस्थानकावरून दुसऱ्या रेल्वेस्थानकावर पाठविण्यात येत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊन त्यांना मनस्ताप होत आहे. तिकिटाची रक्कम देण्यासाठी प्रवाशांना परत पाठविणे चुकीचे आहे. प्रवासी ज्या रेल्वेस्थानकावर गेला तेथे तिकिटाची रक्कम परत देण्याची गरज असल्याचे मत भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंत कुमार शुक्ला यांनी व्यक्त केले.

............

प्रवाशाने सांगितली आपबिती

इतवारीत राहणारे राकेश चड्डा यांनी सांगितले की, त्यांनी २७ मार्चला नागपूर-अमृतसर जाणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२०२५ या गाडीचे तिकीट काढले होते. त्याची किंमत १२ हजार रुपये झाली. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यांनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतवारीला तिकीट रद्द करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना एक तास थांबवून पैसे नसल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर जाण्याचा सल्ला देण्यात आला. नागपूर रेल्वेस्थानकावरही अर्धा तास वाट पाहिल्यानंतर त्यांना तिकिटाची रक्कम देण्यात आली.

................