शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या खात्यात बँकेने टाकली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - ज्या बँकेच्या एटीएममधून त्यांनी रक्कम उडवली, त्याच बँकेच्या अधिकाऱ्यांनी, त्याच चोरट्यांच्या ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ज्या बँकेच्या एटीएममधून त्यांनी रक्कम उडवली, त्याच बँकेच्या अधिकाऱ्यांनी, त्याच चोरट्यांच्या खात्यात रक्कम टाकली. होय, धक्कादायक वाटत असले तरी हे खरे आहे. खुद्द चोरट्यांनीच ही माहितीवजा कबुली पोलिसांकडे दिली आहे.

नवी ‘चाैर्यशैली’ अंगिकारणारे इकबाल खान, अनिस खान, मोहम्मद तालिब नामक गुन्हेगार हरियाणातील पलवल-मेवात गावचे रहिवासी आहेत. ते २१ ते २५ वयोगटातील आहेत. कुणाला कसलीही दुखापत न करता झटक्यात लाखो रुपये उडविण्याचे अफलातून तंत्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी अवगत केले आणि देशातील अनेक शहरात जाऊन विविध बँकांना लाखोंचा चुना लावला. १४ ते १६ जूनच्या दरम्यान या तिघांनी नागपुरातील चार ठिकाणचे एटीएम हॅक करून ६.७५ लाख रुपये काढून घेतले. रक्कम काढताना एटीएममध्ये तब्बल ६७ वेळा एकच एटीएम कार्डचा वापर करण्यात आला. मात्र, कोणताही व्यवहार पूर्ण झाल्याची नोंद बँकेच्या सर्वरमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे ही रक्कम चोरणाऱ्यांना हुडकून काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. ते स्वीकारून पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी या तपासाकडे लक्ष केंद्रित केले. ज्या एटीएम कार्डचा वापर झाला, ते कुणाच्या नावे आहे, ते पोलिसांनी आधी शोधले आणि नंतर त्या कार्डधारकाच्या माध्यमातून पलवल (हरियाणा) गाठत इकबाल खान, अनिस खान, मोहम्मद तालिब या तिघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी या चोरीची कबुली दिली. सोबतच चोरीसोबत शिरजोरीचाही किस्सा पोलिसांना सांगितला. तो स्तंभित करणारा आहे. आरोपींनी नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, मुंबई, भुवनेश्वर, कटक, मिदनापूर, कोलकाता, कर्नाटक, बिदर, आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणम या ठिकाणी अशी चोरी केली. त्याचवेळी त्यांनी भुवनेश्वर, कटक, बिदर आदी ठिकाणी मनासारखी रक्कम न मिळाल्याने लगेच संबंधित बँकेच्या एटीएममधून हेल्पलाईनवर फोन केला. आमचा व्यवहार पूर्ण झाला नाही. रक्कम अडकून पडली आहे, अशी तक्रार नोंदवली. आश्चर्य म्हणजे, बँक अधिकाऱ्यांनी ‘टेक्निकल फॉल्ट’ मान्य करीत आरोपीच्या बँक खात्यात काही दिवसांनी रक्कम जमा केली. उपरोक्त तीन ठिकाणचे नाव आठवत असले तरी अशा प्रकारे अनेकदा आम्ही आमच्या खात्यात रक्कम वळती करून घेतल्याचेही इकबाल, अनिस आणि तालिबने पोलिसांना सांगितले आहे.

----

चोरीनंतर गोवा, मुंबईत माैजमजा

चोरीचे अफलातून तंत्र अवगत करणारे हे भामटे अय्याशीचे जीवन जगत होते. त्यांनी क्रेटा कार विकत घेतली. याच कारने ते वेगवेगळ्या प्रांतात फिरत होते. रस्त्यात लागलेल्या प्रत्येक मोठ्या शहरात हात मारायचा आणि आठ - दहा लाखांची रक्कम एकत्र झाली की गोवा, मुंबईत जाऊन अय्याशी करायची, अशी त्यांची सवय होती. चोरलेली लाखोंची रोकड त्यांनी अशाच प्रकारे उडविल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

---

विविध बँकांची रक्कम सुरक्षित

देशभरातील अनेक बँकांना त्यांचे एटीएम आता अधिक सुरक्षित कसे करता येईल, ते या प्रकारातून ध्यानात घ्यावे लागणार आहे. कारण दोन वर्षांपासून एटीएम हॅक करून रक्कम काढण्याचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. पोलिसांकडे तक्रार करून बँक अधिकारी गप्प बसत होते. गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करून ठिकठिकाणचे पोलीस गप्प बसत होते. टेक्नोसॅव्ही डीसीपी म्हणून ओळख असलेल्या नुरूल हसन यांनी मात्र तीन आठवड्यात या टोळीला हुडकून काढले अन् विविध बँकांची कोट्यवधींची रक्कम तूर्त सुरक्षित केली.

---