शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भविष्य घडविण्यासाठी अमरावतीला गेली होती अमिषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

जगदीश जोशी नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या ...

जगदीश जोशी

नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीला घेऊन गेला होता. मुलीचे भविष्य घडविण्यासाठी आईवडिलांनीही स्वखुशीने अमिषाला मुलगी आणि जावयाकडे सोपविले होते. अमिषा मोठी झाल्यानंतर आलोकने नात्याला काळिमा फासला. शोषणासोबतच जीवनातही हस्तक्षेप केल्यामुळे अमिषा आलोकपासून फटकून वागत होती. त्यामुळे आलोकचा राग अनावर झाला. १५ दिवसापासून या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबीय आणि जवळच्या ४० जणांचे बयान नोंदविले आहेत.

२० जूनच्या रात्री ४५ वर्षीय आलोक मातूरकरने पत्नी विजया (४०), मुलगा साहिल (१२), मुलगी परी (१५), मेव्हणी अमिषा बोबडे (२१), सासू लक्ष्मी बोबडे (५५) यांचा खून करून गळफास घेतला होता. २१ जूनला सकाळी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बागल आखाडा परिसरात खळबळ उडाली होती. दाट लोकवस्तीत एवढी मोठी घटना झाल्यानंतरही शेजाऱ्यांना त्याची माहिती न मिळाल्यामुळे पोलिसही अवाक्‌ झाले होते. अमिषाच्या मोबाईलवर मिळालेल्या ऑडिओ क्लिपिंगमुळे या घटनेतील सत्यस्थिती बाहेर आली होती. आतापर्यंत तपासात आलोकची वासना आणि अमिषाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नरबळी घेतल्याची माहिती समोर येत आहे. आलोक आणि त्याची पत्नी विजया एका गारमेंट कारखान्यात काम करीत होते. आलोक पॅकिंग तर विजया प्रेस करीत होती. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्याने त्यांनी लग्न केले. त्यावेळी अमिषा केवळ ४ ते ५ वर्षांची होती. दोघेही तिला मुलगी समजून प्रेम करीत होते. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे अमिषा विजयाच्या खूप जवळ होती. व्यवसायामुळे आलोक-विजया आठ वर्षांपूर्वी अमरावतीला राहायला गेले. तेथे आलोकने अमरावतीच्या तळेगावमध्ये पत्नीच्या चुलत भावासोबत भागीदारीत गारमेंटचा कारखाना सुरू केला. त्यावेळी अमिषा आठवीत शिकत होती. चांगले शिक्षण देण्याच्या उद्देशाने दोघांनीही अमिषाला अमरावतीला नेले. तेथे नववीत तिला प्रवेश मिळवून दिला. अमिषाने ९ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले. तरुण झाल्यामुळे तिच्या इच्छा आणि खर्च वाढले. आलोक तिचा खर्च भागवीत होता. गारमेंटचा कारखाना चांगला चालत असल्यामुळे आलोकने पैशांची कमतरता भासू दिली नाही. दीड वर्षांपूर्वी अचानक कारखान्यात आग लागल्यामुळे आलोकवर संकट कोसळले. त्याला आर्थिक तंगी जाणवत होती. त्याचे अमिषासोबत खटके उडू लागले. कारखाना जळाल्यामुळे बँकेचे ७० लाखाचे कर्ज झाले. पैशासाठी बँक आणि इतर लोक दबाव टाकू लागले. आलोकला विम्याच्या रकमेचे १८ लाख रुपये मिळाले. त्या पैशातून विजयाच्या चुलत भावासोबत वाद झाला. नव्याने व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने आलोक नागपूरला परतला. लॉकडाऊनमुळे शिलाईचे कामही चांगले चालत नव्हते. आलोक व्यवसाय करण्याऐवजी अमिषाच्या जीवनात दखल देऊ लागला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात नेहमीच वाद होत होते.

...........

शुद्धीवर असताना केले खून

आलोकने शुद्धीत असताना नरसंहाराचे प्रकरण घडवून आणले आहे. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांना दोन दिवसापूर्वी अहवाल मिळाला. यात घटनेच्या वेळी आलोक नशेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याने खुनाच्या उद्देशाने कुटुंबीयांना कोणतेच गुंगीचे औषध दिले नसल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदन अहवालात पत्नी, मुलगी, मेव्हणी आणि सासूच्या गळ्यावर वार केल्याने आणि मुलीचा गळा आवळल्याची माहिती पुढे आली आहे.

मित्रांना सर्व माहीत होते

सूत्रानुसार अमिषाच्या जवळच्या मित्रांना तिच्या नात्याची माहिती होती. परंतु एवढी मोठी घटना घडेल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशीत अमिषाच्या काही मित्रांना विचारपूस केली असता, ते काहीच माहीत नसल्याचे सांगत आहेत. काही मित्र दहशतीत असल्यामुळे खूप प्रयत्न केल्यानंतर ते बयान देण्यासाठी तयार झाले. त्यांना पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील, अशी चिंता वाटत आहे.

................