शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

भविष्य घडविण्यासाठी अमरावतीला गेली होती अमिषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

जगदीश जोशी नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या ...

जगदीश जोशी

नागपूर : वासनेच्या आगीने पेटलेल्या क्रूर आलोकने ज्या अमिषाच्या मोहात नरसंहार केला तिला तो मुलगी समजून चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीला घेऊन गेला होता. मुलीचे भविष्य घडविण्यासाठी आईवडिलांनीही स्वखुशीने अमिषाला मुलगी आणि जावयाकडे सोपविले होते. अमिषा मोठी झाल्यानंतर आलोकने नात्याला काळिमा फासला. शोषणासोबतच जीवनातही हस्तक्षेप केल्यामुळे अमिषा आलोकपासून फटकून वागत होती. त्यामुळे आलोकचा राग अनावर झाला. १५ दिवसापासून या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबीय आणि जवळच्या ४० जणांचे बयान नोंदविले आहेत.

२० जूनच्या रात्री ४५ वर्षीय आलोक मातूरकरने पत्नी विजया (४०), मुलगा साहिल (१२), मुलगी परी (१५), मेव्हणी अमिषा बोबडे (२१), सासू लक्ष्मी बोबडे (५५) यांचा खून करून गळफास घेतला होता. २१ जूनला सकाळी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बागल आखाडा परिसरात खळबळ उडाली होती. दाट लोकवस्तीत एवढी मोठी घटना झाल्यानंतरही शेजाऱ्यांना त्याची माहिती न मिळाल्यामुळे पोलिसही अवाक्‌ झाले होते. अमिषाच्या मोबाईलवर मिळालेल्या ऑडिओ क्लिपिंगमुळे या घटनेतील सत्यस्थिती बाहेर आली होती. आतापर्यंत तपासात आलोकची वासना आणि अमिषाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नरबळी घेतल्याची माहिती समोर येत आहे. आलोक आणि त्याची पत्नी विजया एका गारमेंट कारखान्यात काम करीत होते. आलोक पॅकिंग तर विजया प्रेस करीत होती. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्याने त्यांनी लग्न केले. त्यावेळी अमिषा केवळ ४ ते ५ वर्षांची होती. दोघेही तिला मुलगी समजून प्रेम करीत होते. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे अमिषा विजयाच्या खूप जवळ होती. व्यवसायामुळे आलोक-विजया आठ वर्षांपूर्वी अमरावतीला राहायला गेले. तेथे आलोकने अमरावतीच्या तळेगावमध्ये पत्नीच्या चुलत भावासोबत भागीदारीत गारमेंटचा कारखाना सुरू केला. त्यावेळी अमिषा आठवीत शिकत होती. चांगले शिक्षण देण्याच्या उद्देशाने दोघांनीही अमिषाला अमरावतीला नेले. तेथे नववीत तिला प्रवेश मिळवून दिला. अमिषाने ९ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले. तरुण झाल्यामुळे तिच्या इच्छा आणि खर्च वाढले. आलोक तिचा खर्च भागवीत होता. गारमेंटचा कारखाना चांगला चालत असल्यामुळे आलोकने पैशांची कमतरता भासू दिली नाही. दीड वर्षांपूर्वी अचानक कारखान्यात आग लागल्यामुळे आलोकवर संकट कोसळले. त्याला आर्थिक तंगी जाणवत होती. त्याचे अमिषासोबत खटके उडू लागले. कारखाना जळाल्यामुळे बँकेचे ७० लाखाचे कर्ज झाले. पैशासाठी बँक आणि इतर लोक दबाव टाकू लागले. आलोकला विम्याच्या रकमेचे १८ लाख रुपये मिळाले. त्या पैशातून विजयाच्या चुलत भावासोबत वाद झाला. नव्याने व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने आलोक नागपूरला परतला. लॉकडाऊनमुळे शिलाईचे कामही चांगले चालत नव्हते. आलोक व्यवसाय करण्याऐवजी अमिषाच्या जीवनात दखल देऊ लागला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात नेहमीच वाद होत होते.

...........

शुद्धीवर असताना केले खून

आलोकने शुद्धीत असताना नरसंहाराचे प्रकरण घडवून आणले आहे. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांना दोन दिवसापूर्वी अहवाल मिळाला. यात घटनेच्या वेळी आलोक नशेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्याने खुनाच्या उद्देशाने कुटुंबीयांना कोणतेच गुंगीचे औषध दिले नसल्याचे उघड झाले आहे. शवविच्छेदन अहवालात पत्नी, मुलगी, मेव्हणी आणि सासूच्या गळ्यावर वार केल्याने आणि मुलीचा गळा आवळल्याची माहिती पुढे आली आहे.

मित्रांना सर्व माहीत होते

सूत्रानुसार अमिषाच्या जवळच्या मित्रांना तिच्या नात्याची माहिती होती. परंतु एवढी मोठी घटना घडेल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशीत अमिषाच्या काही मित्रांना विचारपूस केली असता, ते काहीच माहीत नसल्याचे सांगत आहेत. काही मित्र दहशतीत असल्यामुळे खूप प्रयत्न केल्यानंतर ते बयान देण्यासाठी तयार झाले. त्यांना पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतील, अशी चिंता वाटत आहे.

................