शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

कार्यकाळ संपला तरी विदर्भासाठी उपसमिती बनली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्राचा समतोल प्रादेशिक विकास निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्राचा समतोल प्रादेशिक विकास निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हे तिन्ही विकास मंडळ आपल्या पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास १५ महिने लोटल्यानंतरही या मंडळाच्या कार्यकाळास नव्याने मंजुरी मिळू शकलेली नाही. विदर्भ विकास मंडळ तर स्थापनेपासूनच दुर्लक्षित राहिले आहे. कार्यकाळ संपला तरी विभागीय स्तरावरील उपसमिती मात्र बनू शकलेली नाही.

सरकार कुणाचेही असो, विदर्भ विकास मंडळाच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. परिस्थितीचे गांभीर्य यावरून दिसून येते की, ६ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन राज्य सरकारने एक अध्यादेश जारी करून केवळ उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळासाठी विभागीय स्तरावर उपसमिती स्थापन केली होती. विदर्भात उपसमितीची मागणी पूर्वीपासून होत होती. परंतु राज्य सरकारने यादिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. २०१४ मध्ये आलेल्या भाजप सरकारनेही यासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नाही.

उपसमित्यांची स्थापना विभागनिहाय विकास निश्चित करण्यासाठी करण्यात आला होता. उर्वरित महाराष्ट्रातील सर्व विभागासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. त्यांच्या अहवालावर कारवाईसुद्धा करण्यात आली. परंतु विदर्भाच्या दोन (नागपूर व अमरावती) विभागांची उपसमिती स्थापन करण्याबाबत राज्य सरकार काही बोलायला तयार नाही. राज्य सरकारच्या या उदासीनतेमुळेच विदर्भ विरुद्ध अमरावती असा संघर्ष निर्माण झाला असल्याचा दावाही केला जात आहे.

बॉक्स

- विदर्भावर मोठा अन्याय : खडक्कार

विदर्भावर हा मोठा अन्याय आहे. सरकारने केवळ उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी उपसमिती स्थापन केली. विदर्भातील दोन्ही विभाग नागपूर व अमरावतीसाठी उपसमिती स्थापन करण्याची मागणी पूर्वीपासूनच केली जात आहे. परंतु सरकार ती ऐकायलाही तयार नाही. विकास मंडळ पुनरुज्जीवित करण्यात आले तर याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ