शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

बाबासाहेबांचे ‘व्हीजन’ सर्वांगीण विकासाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:28 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : डॉ. आंबेडकर : ‘द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया’ गौरव ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेसोबतच देशाच्या एकूणच विकासाचे व्हीजन मांडले आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत एक व्हीजन मांडले आहे. परंतु त्यांनी मांडलेल्या त्या व्हीजनवर अंमलबवाणी करण्यात आपण अपुरे पडलो, असे प्रतिपादन केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द आर्किटेक्ट आॅफ मॉडर्न इंडिया या गौरव ग्रंथाचे लोकार्पण रविवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामागील प्रांगणात नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, योजना आयोगाचे माजी सदस्य व गौरव ग्रंथाचे अतिथी संपादक डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचनापासून तर शेतीपर्यंत आणि उद्योगापासून तर नदीजोडणीपर्यंत अनेक विषयावर आपले विचार मांडले आहेत. त्यांच्या विचारांवर त्या काळात गांभीर्याने लक्ष दिले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते. त्यांनी नदी वाहतुकीबाबतही सांगितले होते. त्यांच्या विचारानुसार चाललो असतो तर एकट्या नदी वाहतुकीद्वारेच देशाचा विकास दर साडेतीन टक्केपर्यंत वाढला असता. नदी जोड प्रकल्पाबाबतही त्यांनी सांगितले आहे. मी या दोन्ही खात्याचा मंत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारानुसार आपले काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात देशात जलवाहतूक मोठ्या प्रमााणावर सुरू झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी गौरवग्रंथाचे संपादक डॉ. मधुकर कासारे यांनी ग्रंथावर भाष्य केले. प्रास्ताविक कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनी केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.या देशाला बाबासाहेब समजलेच नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्मले हे या देशाचे सुदैव आहे. पण या देशाला बाबासाहेब समजले नाही, हे या देशाचे मोठे दुर्दैव आहे, असे स्पष्ट मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. या देशाने बाबासाहेबांची नेहमीच अवहेलना केली. त्यांना अपमानाशिवाय काहीच दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीरपणे मोठे गोडवे गायले जातात. पण आजही या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आत्मसात करता आले का किंवा आत्मसात करण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून प्रशासनिक दृष्टीने धोरण राबवणारी एक धाडसी व्यक्ती आहे. त्याबद्दल आपल्याला त्यांचा आदर आहे, असे गौरवोद्गारही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी काढले.दोन तास उशीर, श्रोत्यांनी व्यक्त केली नाराजीगौरव ग्रंथ लोकार्पण कार्यक्रमाची वेळ ही ६.३० वाजताची होती. कार्यक्रमासाठी नागपुरातील आंबेडकरी समाजातील लोक व श्रोते मोठ्या संख्येने आले होते. अनेक जण ग्रंथ विकत घेण्यासाठी ५ वाजेपासून आले होते. नितीन गडकरी हे त्याच वेळी एका दुसºया कार्यक्रमात होते. त्यामुळे त्यांना उशीर होणार हे साहजिकच होते. परंतु त्यांनी कार्यक्रम सुरू करा मला यायला उशीर असल्याचे आयोजकांना आधीच कळविले होते. ८ वाजले तरी कार्यक्रम सुरू झाला नसल्याने श्रोते संतापले. अनेक श्रोत्यांनी आयोजकांकडे आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आणि निघून गेले. अखेर पुढच्या कार्यक्रमातून गडकरी निघाले असा मॅसेज आला तेव्हा कुठे ८.२० मिनिटांनी कार्यक्रम सुरू करण्यात आला. श्रोत्यांची आयोजकांबद्दलची नाराजी मात्र कायम होती.