शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अक्षयकुमार काळे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By admin | Updated: March 20, 2016 03:00 IST

विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सेतूमाधवराव पगडी पुरस्कार बुधवारी होणार प्रदान नागपूर : विख्यात काव्य समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांना महाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमीचा सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘गालिबचे उर्दु काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार २३ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ग्रंथासाठी सातत्याने पाच वर्षे आपण परिश्रम केले. या ग्रंथाला रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या तर या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली आहे आणि दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार सुरू आहे. उर्दु आणि मराठीची सेवा करण्यासाठी हा पुरस्कार मला मिळाला. याशिवाय केलेल्या परिश्रमाचा आदर या पुरस्कारामुळे झाल्याचे मला समाधान आहे, अक्षयकुमार काळे म्हणाले. गालिबच्या नावाने अनेक शेर खपविले जातात. अनेकांनी गालिबचे शेर वाचलेलेच नसतात त्यामुळे गालिबच्या शेरोशायरीबद्दल अनेकांमध्ये गोंधळ उडतो. सरधोपट गालिबच्या नावावर शायरी खपविली जाते. या पुस्तकामुळे मात्र गालिबच्या नावावर काहीही खपविले जाऊ शकत नाही. गालिबचे शेर या पुस्तकाच्या माध्यमातून सहज ओळखले जाऊ शकतात. कारण या पुस्तकात रदीफनुसार सूची देण्यात आली आहे. कुठल्या गझलेचा तो शेर आहे, हे देखील या सूचीतून ओळखता येते. यानंतर गालिब चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथ सध्या लिहित आहेत, असे मत त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. (प्रतिनिधी)