शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

प्रकल्पग्रस्तांना हवा निवारा

By admin | Updated: May 9, 2016 02:57 IST

तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

गाव सोडण्याची तयारी : सालेभट्टी येथे केवळ सहा कुटुंब वास्तव्यालाशरद मिरे भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावात पूर्वी ४०० कुटुंब वास्तव्याला होती. त्यातील सहा कुटुंब वगळता इतरांनी पुनर्वसित गावात राहायला सुरुवात केली. या सहा कुटुंबांनी आता गाव सोडण्याची तयारी दर्शविली असून, घराचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘गाव सोडणार नाही’ या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त अडून होते. कालांतराने या प्रकल्पग्रस्तांनी हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. सालेभट्टी येथील सहा कुटुंबाने गावात राहणे पसंत केले. गावाला उद्भवणारा धोक ा विचारात घेता प्रशासनाने या गावातील वीजपुरवठा बंद केला. त्यात गावातील शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, स्वस्त धान्याचे दुकान पुनवर्सित स्थळी स्थानांतरित करण्यात आले. दोन वर्षापासून येथील बहुतांश घरांमध्ये कुणीही राहात नाही. नागरिकांनी गाव सोडताच घराच्या खिडक्या, दारे व इतर साहित्य काढून नेले. त्यामुळे गावात केवळ पडक्य भिंती नजरेस पडतात. परिणामी, संपूर्ण गाव भकास झाले आहे. दरम्यान, अविनाश नाईक, शामराव ठाकरे, प्रवीण बहादुरे, तानाबाई खरकाळे, सुमन कांबळी, अरुण वरखडे या सहा कुटुंबातील २० सदस्यांनी गाव सोडण्याची तयारी दर्शविली. घराचे बांधकाम होईपर्यंत आमच्या निवाऱ्याची सोय करा, एवढी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निर्जन गावात ८० वर्षीय दशरथ मोटघरे यांची चहाची टपरी आहे. गावात दुभती जनावरे नसल्याने दूध मिळत नाही. त्यामुळे ते ‘ब्लॅक टी’ विकतात. दिवसभरात केवळ २० हाफ चहाची विक्री होते. कारण गावात फक्त २० च माणसं राहतात. एखादा साहेब आलाच तर अपवाद, अशी माहिती मोटघरे यांनी दिली. गावातील माणसं आपाापल्या घरी चहा पिऊ शकतात. पण, मोटघरे यांना रोजगार मिळावा म्हणून, ते रोज चहा मोटघरे यांच्या टपरीवर चहा पिणे पसंत करतात.अवनीची घुसमट‘अवनी’ ही दीड वर्षाची आहे. गावात तिच्यासोबत खेळायला कुणीही समवयस्क नाहीत. त्यामुळे ती दिवसभर प्राण्यांसोबत खेळत कसातरी दिवस घालविते. वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे अवनी घाबरते. या ‘चिमुकल्यांसाठी आम्हाला गाव सोडायचं आहे’ अशी प्रतिक्रिया अवनीचे वडील अविनाश नाईक यांनी व्यक्त केली.अन् त्यांना मिळाला दिलासाया विदारक वास्तवाची माहिती मिळताचं सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रविवारी या सहाही कुटुंबीयांची सालेभट्टी येथे जाऊन भेट घेतली. अख्खे गाव फिरल्यानंतर दार नसलेल्या एका झोपडीत पाळणा हलताना दिसला. पाळण्यात सहा महिन्यांचा चिमुकला झोपला होता. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. तासाभरानंतर गावातील सहाही कुटुंबातील सदस्य गोळा झाले. त्यांनी त्यांची व्यथा राजू पारवे यांच्या समक्ष कथन केली. हा तिढा सोडविण्यासाठी आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना दिली. यावेळी कृष्णा घोडेस्वार, रमेश भजभुजे, देवेंद्र देशमुख उपस्थित होते.