शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना हवा निवारा

By admin | Updated: May 9, 2016 02:57 IST

तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

गाव सोडण्याची तयारी : सालेभट्टी येथे केवळ सहा कुटुंब वास्तव्यालाशरद मिरे भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावात पूर्वी ४०० कुटुंब वास्तव्याला होती. त्यातील सहा कुटुंब वगळता इतरांनी पुनर्वसित गावात राहायला सुरुवात केली. या सहा कुटुंबांनी आता गाव सोडण्याची तयारी दर्शविली असून, घराचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘गाव सोडणार नाही’ या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त अडून होते. कालांतराने या प्रकल्पग्रस्तांनी हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. सालेभट्टी येथील सहा कुटुंबाने गावात राहणे पसंत केले. गावाला उद्भवणारा धोक ा विचारात घेता प्रशासनाने या गावातील वीजपुरवठा बंद केला. त्यात गावातील शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, स्वस्त धान्याचे दुकान पुनवर्सित स्थळी स्थानांतरित करण्यात आले. दोन वर्षापासून येथील बहुतांश घरांमध्ये कुणीही राहात नाही. नागरिकांनी गाव सोडताच घराच्या खिडक्या, दारे व इतर साहित्य काढून नेले. त्यामुळे गावात केवळ पडक्य भिंती नजरेस पडतात. परिणामी, संपूर्ण गाव भकास झाले आहे. दरम्यान, अविनाश नाईक, शामराव ठाकरे, प्रवीण बहादुरे, तानाबाई खरकाळे, सुमन कांबळी, अरुण वरखडे या सहा कुटुंबातील २० सदस्यांनी गाव सोडण्याची तयारी दर्शविली. घराचे बांधकाम होईपर्यंत आमच्या निवाऱ्याची सोय करा, एवढी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निर्जन गावात ८० वर्षीय दशरथ मोटघरे यांची चहाची टपरी आहे. गावात दुभती जनावरे नसल्याने दूध मिळत नाही. त्यामुळे ते ‘ब्लॅक टी’ विकतात. दिवसभरात केवळ २० हाफ चहाची विक्री होते. कारण गावात फक्त २० च माणसं राहतात. एखादा साहेब आलाच तर अपवाद, अशी माहिती मोटघरे यांनी दिली. गावातील माणसं आपाापल्या घरी चहा पिऊ शकतात. पण, मोटघरे यांना रोजगार मिळावा म्हणून, ते रोज चहा मोटघरे यांच्या टपरीवर चहा पिणे पसंत करतात.अवनीची घुसमट‘अवनी’ ही दीड वर्षाची आहे. गावात तिच्यासोबत खेळायला कुणीही समवयस्क नाहीत. त्यामुळे ती दिवसभर प्राण्यांसोबत खेळत कसातरी दिवस घालविते. वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे अवनी घाबरते. या ‘चिमुकल्यांसाठी आम्हाला गाव सोडायचं आहे’ अशी प्रतिक्रिया अवनीचे वडील अविनाश नाईक यांनी व्यक्त केली.अन् त्यांना मिळाला दिलासाया विदारक वास्तवाची माहिती मिळताचं सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रविवारी या सहाही कुटुंबीयांची सालेभट्टी येथे जाऊन भेट घेतली. अख्खे गाव फिरल्यानंतर दार नसलेल्या एका झोपडीत पाळणा हलताना दिसला. पाळण्यात सहा महिन्यांचा चिमुकला झोपला होता. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. तासाभरानंतर गावातील सहाही कुटुंबातील सदस्य गोळा झाले. त्यांनी त्यांची व्यथा राजू पारवे यांच्या समक्ष कथन केली. हा तिढा सोडविण्यासाठी आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना दिली. यावेळी कृष्णा घोडेस्वार, रमेश भजभुजे, देवेंद्र देशमुख उपस्थित होते.