शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

हवा हीच आता दवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:07 IST

पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, हा इशारा ऐकत मोठी झालेली आताची तरुण पिढी किंवा त्याआधीच्या पिढीनेही कधी विचार केला नसेल ...

पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, हा इशारा ऐकत मोठी झालेली आताची तरुण पिढी किंवा त्याआधीच्या पिढीनेही कधी विचार केला नसेल की जगण्याच्या महायुद्धात माणसांचे जीव पाण्याआधी प्राणवायूने जातील. किमान भारतात तरी सध्या असेच झालेय. रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी खालावली व रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने कोरोना संक्रमित रुग्णांचे जीव गेल्याच्या बातम्या रोज येताहेत. राजधानी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून बहुतेक सगळी हॉस्पिटल्स अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक राहिल्याचे रोजच निरोप देताहेत. मोठमोठ्या इस्पितळांचे व्यवस्थापन हतबल झाल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अपघात व त्यात रुग्णांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. औषधे, गोळ्या-इंजेक्शन्सच्या आधी ऑक्सिजन ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी सगळी खाती मरणासन्न रुग्णांना प्राणवायू पुरविण्यासाठी झटताहेत. एरव्ही रस्त्याच्या कडेला टपरीवजा दुकानात रांगेने उभे ठेवलेले ऑक्सिजनचे सिलिंडर कधी लक्षही वेधून घ्यायचे नाहीत. ते आता जगण्याचे साधन बनले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत देशात मेडिकल ऑक्सिजनची मागणी तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक वाढली. ज्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचे संकट गंभीर संकट उभे राहिले तिथल्या उच्च न्यायालयांनी जनहित याचिकांवर सुनावणी करताना सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. अर्थातच यंत्रणा हलली. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर, पोलाद व अन्य उद्योगांमधील सगळा औद्योगिक वापराचा ऑक्सिजन आता वैद्यकीय उपयोगाकडे वळविण्यात आला. अनेक छोटेमोठे उद्योग ऑक्सिजन उत्पादनाकडे वळले. इतक्या आणीबाणीच्या काळातही वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनवर उत्पादशुल्क, आयातीवर अधिभार, त्यासंबंधी उपकरणांवर कराचा बोजा असल्याची बाब राज्य सरकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर शनिवारी हे कर माफ करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले. याशिवाय देशाची किमान बारा-पंधरा दिवसांची गरज भागवू शकेल इतका म्हणजे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

थोडक्यात ऑक्सिजनअभावी प्राण कंठाशी आले आहेत. त्याचे कारण कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या फुफ्फुसांमध्ये दडले आहे. साध्या हवेत जवळपास २१ टक्के ऑक्सिजन असतो. आपले फुफ्फुस हवेचे शुद्धीकरण करतात व शरीराला प्राणवायू पुरवतात. संसर्गामुळे फुफ्फुसांची ती शारीरिक प्रक्रिया मंदावली. श्वास घेणे अशक्य बनले. त्यावर उपचार म्हणून पुरवला जाणारा, श्वासोच्छ्वास सुरळीत करणारा ऑक्सिजन द्रवरूप असतो. साध्या हवेतील प्राणवायू हा नायट्रोजन, अरगॉन, हायड्रोजन आदी वायू वेगळे करून वेगळा काढलेला असतो. तो शुद्ध ऑक्सिजन क्रायोजेनिक टाक्यांमध्ये, टँकरमध्ये भरून उणे तापमानात रुग्णालयांना पोचवला जातो. अशा प्राणवायू पुरवठ्याची देशात एक व्यवस्था आहे. हजारांच्या वर क्रायोजेनिक टँकर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करतात. गेल्या पंधरा दिवसांत त्याचे चालक अहोरात्र सेवा देताहेत, पण महाकाय देशासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याने रेल्वे खात्याने ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचा आणि ती वेळेत पोहोचावी म्हणून ग्रीन कॉरिडोरच्या रूपाने तिच्या प्रवासाचा मार्ग मोकळा ठेवण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून सात टँकर घेऊन अशी पहिली एक्स्प्रेस शुक्रवारी महाराष्ट्रात आली. नागपूर व नाशिकला ते टँकर उतरविण्यात आले. विदर्भ व उत्तर महाराष्ट्राला प्राणवायूच्या या पुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला. देशाच्या अन्य भागातही अशा एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधून ऑक्सिजन पुरवला जातोय. त्यामुळे देशात येत्या आठवड्यात कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे. अर्थात, कोविड महामारीचे भयंकर स्वरूप पाहता ऑक्सिजन तुटवडा हा एक छोटा पैलू आहे. गेल्या सव्वा वर्षात या महासंकटाने अनेेक नवी आव्हाने उभी केली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्यास, प्राणवायूची व्यवस्था सुधारल्यास फारतर काही अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचू शकतील. केवळ त्यामुळे महामारीवर विजय मिळवता येणार नाही. कोविड प्रतिबंधक लस हाच सध्या त्यावरचा रामबाण उपाय दिसतो आहे. त्याचा विचार करता आव्हानांच्या मालिकेत आणखी एक मोठे आव्हान समोर आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा झाली आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरेशी लस उपलब्ध करून देणे व ती देण्यासाठी कसलाही गोंधळ नसलेली व्यवस्था उभी करणे या आव्हानाचा मुकाबला देशाला करायचा आहे.

----------------------------------------