शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हवा हीच आता दवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:07 IST

पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, हा इशारा ऐकत मोठी झालेली आताची तरुण पिढी किंवा त्याआधीच्या पिढीनेही कधी विचार केला नसेल ...

पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, हा इशारा ऐकत मोठी झालेली आताची तरुण पिढी किंवा त्याआधीच्या पिढीनेही कधी विचार केला नसेल की जगण्याच्या महायुद्धात माणसांचे जीव पाण्याआधी प्राणवायूने जातील. किमान भारतात तरी सध्या असेच झालेय. रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी खालावली व रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने कोरोना संक्रमित रुग्णांचे जीव गेल्याच्या बातम्या रोज येताहेत. राजधानी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून बहुतेक सगळी हॉस्पिटल्स अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक राहिल्याचे रोजच निरोप देताहेत. मोठमोठ्या इस्पितळांचे व्यवस्थापन हतबल झाल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अपघात व त्यात रुग्णांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. औषधे, गोळ्या-इंजेक्शन्सच्या आधी ऑक्सिजन ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी सगळी खाती मरणासन्न रुग्णांना प्राणवायू पुरविण्यासाठी झटताहेत. एरव्ही रस्त्याच्या कडेला टपरीवजा दुकानात रांगेने उभे ठेवलेले ऑक्सिजनचे सिलिंडर कधी लक्षही वेधून घ्यायचे नाहीत. ते आता जगण्याचे साधन बनले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत देशात मेडिकल ऑक्सिजनची मागणी तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक वाढली. ज्या राज्यांमध्ये ऑक्सिजनचे संकट गंभीर संकट उभे राहिले तिथल्या उच्च न्यायालयांनी जनहित याचिकांवर सुनावणी करताना सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. अर्थातच यंत्रणा हलली. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर, पोलाद व अन्य उद्योगांमधील सगळा औद्योगिक वापराचा ऑक्सिजन आता वैद्यकीय उपयोगाकडे वळविण्यात आला. अनेक छोटेमोठे उद्योग ऑक्सिजन उत्पादनाकडे वळले. इतक्या आणीबाणीच्या काळातही वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनवर उत्पादशुल्क, आयातीवर अधिभार, त्यासंबंधी उपकरणांवर कराचा बोजा असल्याची बाब राज्य सरकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर शनिवारी हे कर माफ करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले. याशिवाय देशाची किमान बारा-पंधरा दिवसांची गरज भागवू शकेल इतका म्हणजे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

थोडक्यात ऑक्सिजनअभावी प्राण कंठाशी आले आहेत. त्याचे कारण कोरोना संसर्गामुळे बाधित होणाऱ्या फुफ्फुसांमध्ये दडले आहे. साध्या हवेत जवळपास २१ टक्के ऑक्सिजन असतो. आपले फुफ्फुस हवेचे शुद्धीकरण करतात व शरीराला प्राणवायू पुरवतात. संसर्गामुळे फुफ्फुसांची ती शारीरिक प्रक्रिया मंदावली. श्वास घेणे अशक्य बनले. त्यावर उपचार म्हणून पुरवला जाणारा, श्वासोच्छ्वास सुरळीत करणारा ऑक्सिजन द्रवरूप असतो. साध्या हवेतील प्राणवायू हा नायट्रोजन, अरगॉन, हायड्रोजन आदी वायू वेगळे करून वेगळा काढलेला असतो. तो शुद्ध ऑक्सिजन क्रायोजेनिक टाक्यांमध्ये, टँकरमध्ये भरून उणे तापमानात रुग्णालयांना पोचवला जातो. अशा प्राणवायू पुरवठ्याची देशात एक व्यवस्था आहे. हजारांच्या वर क्रायोजेनिक टँकर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करतात. गेल्या पंधरा दिवसांत त्याचे चालक अहोरात्र सेवा देताहेत, पण महाकाय देशासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याने रेल्वे खात्याने ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचा आणि ती वेळेत पोहोचावी म्हणून ग्रीन कॉरिडोरच्या रूपाने तिच्या प्रवासाचा मार्ग मोकळा ठेवण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून सात टँकर घेऊन अशी पहिली एक्स्प्रेस शुक्रवारी महाराष्ट्रात आली. नागपूर व नाशिकला ते टँकर उतरविण्यात आले. विदर्भ व उत्तर महाराष्ट्राला प्राणवायूच्या या पुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला. देशाच्या अन्य भागातही अशा एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधून ऑक्सिजन पुरवला जातोय. त्यामुळे देशात येत्या आठवड्यात कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी आशा आहे. अर्थात, कोविड महामारीचे भयंकर स्वरूप पाहता ऑक्सिजन तुटवडा हा एक छोटा पैलू आहे. गेल्या सव्वा वर्षात या महासंकटाने अनेेक नवी आव्हाने उभी केली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्यास, प्राणवायूची व्यवस्था सुधारल्यास फारतर काही अत्यवस्थ रुग्णांचे प्राण वाचू शकतील. केवळ त्यामुळे महामारीवर विजय मिळवता येणार नाही. कोविड प्रतिबंधक लस हाच सध्या त्यावरचा रामबाण उपाय दिसतो आहे. त्याचा विचार करता आव्हानांच्या मालिकेत आणखी एक मोठे आव्हान समोर आहे. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा झाली आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला पुरेशी लस उपलब्ध करून देणे व ती देण्यासाठी कसलाही गोंधळ नसलेली व्यवस्था उभी करणे या आव्हानाचा मुकाबला देशाला करायचा आहे.

----------------------------------------