शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीचा तिढा!

By admin | Updated: July 2, 2016 03:12 IST

नागपूर : राज्यात कृषी सेवा वर्ग-२ (क) या संवर्गातील कृषी अधिकाऱ्यांची सुमारे ४१७ पदे रिक्त असताना, मागील चार वर्षांपासून

शेकडो पदे रिक्त : राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचा पाठपुरावा नागपूर : राज्यात कृषी सेवा वर्ग-२ (क) या संवर्गातील कृषी अधिकाऱ्यांची सुमारे ४१७ पदे रिक्त असताना, मागील चार वर्षांपासून कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे, यापैकी ९९ टक्के कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना वर्ग-२ (क) या संवर्गात पदोन्नती दिल्याने शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. सध्या राज्य शासन मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व पंतप्रधान पीक विमा अशा विविध योजना राबवीत आहे. मात्र या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्याचा योजनांवर परिणाम होत आहे. योजना राबविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी पर्यवेक्षकांच्या डोक्यावर अतिरिक्त कामाचा बोजा निर्माण झाला आहे. कृषी विभागात कृषी अधिकारी गट-२ (क) या संवर्गात एकूण १६५२ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी तब्बल ४०० पेक्षा अधिक पदे रिक्त पडली आहेत. त्यामुळे या सर्व रिक्त पदांवर कृषी पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, अशी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेच्यावतीने मागणी केली आहे. यासंबंधी संघटनेने कृषी विभागासह कृषी मंत्रालयापर्यंत सतत पाठपुरावा केला आहे. संघटनेला अनेकदा आश्वासनेही मिळाली आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया ही मागील चार वर्षांपासून सुरू आहे. शिवाय त्याला विभागीय पदोन्नती समितीसह सामान्य प्रशासन विभाग व कृषी आयुक्तालयासह इतर विभागांची मान्यता मिळाली असून, ती फाईल मागील दीड वर्षांपासून मंत्रालयात धूळ खात पडली असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)