शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कृषी क्षेत्राच्या उत्पादनात २५ टक्के वाढ आवश्यक

By admin | Updated: May 4, 2015 02:20 IST

देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे.

नागपूर: देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे. मात्र देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारीत वाढ होत आहे. हे चित्र पालटायचे असेल तर कृषी क्षेत्राच्या सकल उत्पादनात २५ टक्केपर्यंत वाढ करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कृषी उत्पादनात वाढ होत असल्याचे अनेक राज्यात दिसून आले आहे. मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर २३ टक्के, गुजरातमध्ये १४ टक्के तर महाराष्ट्रात फक्त ४ टक्के आहे. गावात पाणी आल्यास गावाचे अर्थशास्त्र बदलते, या दृष्टीने जलयुक्त शिवार ही योजना राबवा. देशातील विविध राज्यात पाण्यासाठी वाद आहेत, पण वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी कुणीच काही करीत नाही. पाणी अडविले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवून पुढच्या वर्षी जिल्ह्यात एकही टॅन्कर धावणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, गोसेखुर्द पुनर्वसनाचे काम तातडीने करावे, पशुपालन, गोदुग्ध उत्पादनसाठी जास्त दूध देणाऱ्या गार्इंची संख्या विदर्भात वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना स्वस्त: दरात खत (पोटॅश) उपलब्ध व्हावे यासाठी इराणमध्ये सरकारच्या माध्यमातून पोर्ट बांधण्यात येत असून तेथी गॅस कमी किमतीत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात यश आल्यास भारतात कमी दरात खत उपलब्ध होऊ शकेल.त्याचप्रमाणे धापेवाडा येथे केसावर प्रक्रिया करून रसायन तयार करणारा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून हे रसायन शेतीसाठी उपयोगी आहे. (प्रतिनिधी)