शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्राच्या उत्पादनात २५ टक्के वाढ आवश्यक

By admin | Updated: May 4, 2015 02:20 IST

देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे.

नागपूर: देशाच्या सकल उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ६२ टक्के तर कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १४ टक्के आहे. मात्र देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारीत वाढ होत आहे. हे चित्र पालटायचे असेल तर कृषी क्षेत्राच्या सकल उत्पादनात २५ टक्केपर्यंत वाढ करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कृषी उत्पादनात वाढ होत असल्याचे अनेक राज्यात दिसून आले आहे. मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर २३ टक्के, गुजरातमध्ये १४ टक्के तर महाराष्ट्रात फक्त ४ टक्के आहे. गावात पाणी आल्यास गावाचे अर्थशास्त्र बदलते, या दृष्टीने जलयुक्त शिवार ही योजना राबवा. देशातील विविध राज्यात पाण्यासाठी वाद आहेत, पण वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी कुणीच काही करीत नाही. पाणी अडविले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवून पुढच्या वर्षी जिल्ह्यात एकही टॅन्कर धावणार नाही, यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, गोसेखुर्द पुनर्वसनाचे काम तातडीने करावे, पशुपालन, गोदुग्ध उत्पादनसाठी जास्त दूध देणाऱ्या गार्इंची संख्या विदर्भात वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना स्वस्त: दरात खत (पोटॅश) उपलब्ध व्हावे यासाठी इराणमध्ये सरकारच्या माध्यमातून पोर्ट बांधण्यात येत असून तेथी गॅस कमी किमतीत मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात यश आल्यास भारतात कमी दरात खत उपलब्ध होऊ शकेल.त्याचप्रमाणे धापेवाडा येथे केसावर प्रक्रिया करून रसायन तयार करणारा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून हे रसायन शेतीसाठी उपयोगी आहे. (प्रतिनिधी)