शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अग्रवालचा जामीन फेटाळला

By admin | Updated: September 11, 2016 02:07 IST

सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठमागील भगवाघर ले-आऊट येथील एका कुटुंबाला काही वेळ ओलिस ठेवून मायलेकाला मारहाण करून

घर रिकामे करण्यासाठी भाडोत्री गुंडांकडून मायलेकाचे अपहरणनागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठमागील भगवाघर ले-आऊट येथील एका कुटुंबाला काही वेळ ओलिस ठेवून मायलेकाला मारहाण करून कारमधून अपहरण केल्याचा आरोप असलेल्या मुख्य सूत्रधाराचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. कैलाशचंद गोकुलप्रसाद अग्रवाल (५७), असे आरोपीचे नाव असून तो सूर्यनगर कळमना येथील रहिवासी आहे. अग्रवाल याने भाडोत्री गुंडांना सोबत घेऊन १ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास रॉय यांचे घर गाठले होते. त्यांनी सुलेख रॉय यांना मारहाण करून संपूर्ण कुटुंबाला तब्बल तीन तास ओलिस ठेवले होते. घरातील सामान बाहेर फेकून दिले होते. त्यानंतर सुलेख रॉय आणि त्याच्या आईला कारमध्ये कोंबून धंतोली येथील यशवंत स्टेडियमजवळ पहाटे ३ वाजताच्या सुमारास सोडून दिले होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या ३९५, ३६३, ४५२, ३४२, ५०४, ५०६, १०९, १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल करून शिवप्रसाद मुरली बेंजकीवार (२६)रा. पांढरकवडा, भीम कोमल यादव (२३) रा. चंद्रपूर, नितीन ठाकूर (२३) रा. त्रिमूर्तीनगर, सूरज चौधरी (२५) रा. पारधीनगर हिंगणा, कैलाशचंद अग्रवाल (५७) रा. आणि परवेश गौरीशंकर गुप्ता (२४) रा. राजीवनगर पांढराबोडी, अशा सहा जणांना अटक केली होती. त्यांचे दोन साथीदार हे पळून गेलेले आहेत. आरोपींपैकी कैलाशचंद अग्रवाल याने जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)