शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

कलाकृतीनंतर लेखिकांनी संयम बाळगावा

By admin | Updated: December 29, 2014 02:42 IST

लेखन आपण आनंदासाठीच करायला हवे आणि हा आनंद इतरांना देण्यासाठी लेखन इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे.

नागपूर : लेखन आपण आनंदासाठीच करायला हवे आणि हा आनंद इतरांना देण्यासाठी लेखन इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. ते लेखिकांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. पण लेखनानंतर लगेच ते प्रसिद्ध करण्याची घाई मात्र करू नये. थोडा संयम बाळगला तर कलाकृतीत सुधारणा करायला वाव मिळतो आणि लेखन अधिक चांगले व परिपक्व होते. त्यामुळे थोडा संयम नवोदितांनी बाळगणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, माहेर संस्था आणि आकांक्षा प्रकाशनाद्वारे बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय लिहित्या स्त्रियांची तृतीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, संयोजिका अरुणा सबाने प्रामुख्याने उपस्थित होते. भडभडे म्हणाल्या, खूप लेखनापेक्षा दर्जेदार लेखन करावे. त्यात भावना असली पाहिजे. या कार्यशाळेतून अनेक नव्या लेखिका निर्माण होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. श्रीपाद अपराजित म्हणाले, अधिवेशनाच्या काळात सरकार येथे असताना ४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याच्या विधवेने आत्महत्या केल्याचे ऐकीवात नाही. माओवाद्यांनी अनेक महिलांच्या पतींना ठार केले, त्या विधवा आहेत. ग्रामीण भागातल्या या विधवांचे, स्त्रियांचे प्रश्न, संघर्ष समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा ग्रामीण भागात आयोजित करण्याची गरज आहे. ताराबाई शिंदे यांनी ज्या काळात महिलांवर बंधने होती त्या काळात ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे पुस्तक लिहिले. पण आजही अनेक स्त्रिया कौटुंबिक आणि सामाजिक बंधनामुळे लिहिण्यास कचरतात. त्यांना किमान बोलते करता आले तर अनेक नवे अनुभव येतील. स्त्रियांनी त्यांचे अनुभव अधिक भिडस्तपणे मांडण्याची गरज असून, त्यात आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीने केलेल्या अन्यायाचा सूड घेण्याचा विद्वेष असू नये, असे ते म्हणाले. गिरीश गांधी म्हणाले, अरुणा सबाने यांनी आयोजित केलेली ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. स्त्री म्हणून केवळ पुरुषांच्या अन्यायावर न लिहिता त्यापलीकडे जाण्याची वृत्ती स्त्रियांनी ठेवायला हवी. इच्छा असेल तर मार्गही सापडतोच.स्त्रियांची अभिव्यक्ती अधिक सकसपणे व्हावी यासाठी कार्यशाळेचा उपयोग नव्या लेखिकांना झाला असेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन डॉ. अनुजा भोंडे यांनी आणि आभार अरुणा सबाने यांनी मानले. (प्रतिनिधी)