ओढ दीक्षाभूमीची : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत देशभरातील बौद्ध बांधवांचा जनसागर दीक्षाभूमीवर अवतरला आहे. बुधवारी दीक्षाभूमीवर आलेल्या या अनुयायाने बाबासाहेबांच्या पुतळ््याला आणि दीक्षाभूमीला मोबाईलमध्ये एकत्रित टिपत बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.
ओढ दीक्षाभूमीची
By admin | Updated: October 22, 2015 04:17 IST