शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर सहन कराव्या लागतात प्रशासकीय वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 10:10 IST

विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडचे आरोग्य सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेंडंटची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.

ठळक मुद्देवास्तव मेडिकलचे रुग्णाला वेदना सहन करीत चढावे लागतात दोन मजले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडचे आरोग्य सांभाळणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अटेंडंटची मोठ्या संख्येत पदे रिक्त असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. विशेष म्हणजे, नेत्ररोगाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना वेदना सहन करीत नातेवाईकांचा आधार घेत तळमजल्यापासून ते दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डात चालत जावे लागते. वृद्ध, अपंगांना घेऊन जाण्यासाठी साधे स्ट्रेचरही उपलब्ध करून दिले जात नसल्याने रुग्णांना उचलून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ एवढेच अटेंडंटची भूमिका महत्त्वाची असते.रुग्णाला तातडीने अतिदक्षता विभाग किंवा शस्त्रक्रियागृहात पोहचविण्यासाठी अटेंडंटची कामगिरी मोलाची ठरते. मात्र, मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नोंद असलेल्या मेडिकलमध्ये अटेंडंटची तब्बल ३७२ पदे रिक्त आहेत. जे आहेत त्यातील फार कमी जण जागेवर उपलब्ध राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर स्ट्रेचरपासून ते आॅक्सिजन सिलिंडर ओढण्याची वेळ येते. ही बिकट वेळ निभावून नेताना दमछाक होते. अनेक वेळा रुग्णाच्या जीवावरही बेतते. असे असले तरी शासनाने अद्यापही यावर तोडगा काढलेला नसल्याने मेडिकल प्रशासनही अडचणीत आले आहे. पूर्वी मेडिकलमध्ये २६ वॉर्ड होते. रुग्णांची संख्या मर्यादित होती. विभागही फार कमी होते. सध्या वॉर्डाची संख्या ४८ झाली आहे, तर खाटांची संख्या १५०० वर पोहचली आहे. विविध विभागातही वाढ झाली आहे. परंतु गेल्या ६४ वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पदात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतलेला नाही. सद्यस्थितीत मेडिकलमध्ये अटेंडंटची ५५६ पदे मंजूर आहेत, मात्र यातील केवळ १८४ पदे भरली आहेत. यांची वॉर्डासह बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृहातही ड्युटी लावली जात असल्याने वॉर्डात एक अटेंडंट देणेही रुग्णालय प्रशासनाला अडचणीचे जात आहे. यातच ६० टक्के अटेंडंटचे वय ५० च्यावर आहे. त्यांच्याकडून धावपळीचे कामे होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच आलेली वेळ निभावून न्यावी लागत आहे.

रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी पदभरती आवश्यकचमेडिकलमध्ये रुग्ण व विभागाची संख्या वाढत चालली आहे. परंतु त्या तुलनेत अटेन्डंट व सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. शासन आऊटसोर्सिंग करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे. परंतु ‘आऊटसोर्सिंग’ भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. त्यांना रुग्णालयात कामाची सवय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ओढण्यापासून ते इतरही कामे करावी लागत असल्याचे वास्तव. रुग्णसेवा सुरळीत चालण्यासाठी शासनाने पदभरती करणे आवश्यक आहे.-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालयव आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (इंटक)

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय