शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

सिंचनासोबतच आता मत्स्यपालनही

By admin | Updated: May 23, 2017 02:03 IST

नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे.

विभागीय आयुक्त अनुप कुमार : तलाव तेथे मासोळी अभियानाचा आज शुभारंभलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीलक्रांती धोरणांतर्गत सिंचनासोबतच मत्स्यपालनावर भर दिला जात आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या पुढकाराने या धोरणांतर्गत विभागीयस्तरावर तलाव तेथे मासोळी हे अभियान राबविले जात आहे. २३ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथून या अभियानाला सुरुवात होत आहे. विभागातील २७४ महसूल मंडळामध्ये प्रत्येकी किमान १० तलावांवर मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धनाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नागपूर विभागात गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रात मत्स्य व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. विभागात सुमारे ७ हजार ४१५ प्रकल्प तसेच माजी मालगुजारी तलाव असून यामध्ये १४ मोठे, ४९ मध्यम, ६१८ राज्य व स्थानिक लघु सिंचन प्रकल्प तसेच ६ हजार ७३४ माजी मालगुजारी तलाव मत्स्यसंवर्धनासाठी उपयुक्त असल्यामुळे विविध योजना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन घेणे शक्य आहे. अभियानांतर्गत प्रत्येक महसूल मंडळात किमान सहा तलावांमध्ये प्रति हेक्टरी ५ हजार बोटुकली याप्रमाणे १३ लक्ष ७० हजार बोटुकली संचय करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावांची निवड करणे तसेच जिल्हास्तरावरील उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर जून ते जुलै या कालावधीत मत्स्यजिरे ते बोटुकली संवर्धन करणे व आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत बोटुकली संचयन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासोबतच अनुवांशिकदृष्ट्या सुधारित जातीच्या मासोळीचे संवर्धन करणे या माध्यमातून रोजगाराची निर्मिती तसेच खासगी मत्स्यसंवर्धन, शेततळीधारक, सामान्य शेतकरी, बचत गट आदींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘तलाव तेथे मासोळी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य असून लाँगशिप कार्यक्रम म्हणून केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. अभियान मत्स्यव्यवसाय विकास विभाग, जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना, आदिवासी विकास विभाग, पीएसआर, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मनरेगा आदी योजना एकत्र करून हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे.विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर गोड्या पाण्याचे क्षेत्र राज्यात सुमारे ३ लक्ष २२ हजार हेक्टर गोड्या पाण्यातील भूजल क्षेत्रापैकी नागपूर विभागात १ लक्ष १० हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात १२.७४ हेक्टर, गोंदिया २१.३३५ हेक्टर, चंद्रपूर १७.७५२ हेक्टर तर गडचिरोली जिल्ह्यात ८.६५० हेक्टर क्षेत्रामध्ये मत्स्य शेती करण्याकरिता चांगला वाव आहे. मच्छिमारी व्यवसायात पारंपरिक काम करणारे एकूण ४ लक्ष २७ हजार लोकसंख्या असल्यामुळे एका तलावात सरासरी दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादन होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे उत्पन्न वाढविणे तसेच मानव विकास निर्देशांक उंचावण्यासोबत कुपोषण कमी करण्याला मदत मिळणार आहे.