शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्मार्ट सिटीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Updated: March 15, 2017 02:25 IST

संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ;

संदीप जाधव यांनी सांगितला विकासाचा अजेंडा, प्रगतिपथावरील प्रकल्पांसाठी निधी ; उत्पन्न वाढीसाठी नियोजन नागपूर : उपराजधानी पुढील काही वर्षात देशातील टॉप स्मार्टसिटी होणार आहे. या दृष्टीने विकास कामे सुरू आहेत. परंतु ती जलद गतीने व्हावी, सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाला अधिक प्राधान्य देणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जाधव यांनी मंगळवारी ‘लोकमत’ शी चर्चा करताना शहर विकासाचे ‘व्हीजन’ मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेल्या शहर विकासाच्या मार्गावर महापालिकेचा कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारकडून प्रथमच विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. परंतु शहर विकासात महापालिकेचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याने आर्थिक स्थिती भक्कम करावी लागेल. ज्या-ज्या मार्गाने महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो, अशा विभागांचा क्रमवार आढावा घेऊ न नवीन आर्थिक स्रोत शोधण्याचा प्रयत्न राहील. महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजार, आॅरेंज सिटी स्ट्रीट, सोख्ताभवन असे विकास प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. महापालिका आयुक्त २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर अभ्यास करून एप्रिल महिन्यात स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करू. प्रगतिपथावरील प्रकल्पांना निधीची कमतरता भासू नये यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल, अशी माहिती जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी) दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महापालिका निवडणुकीत भाजपाने जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आश्वासने दिलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. पुढील पाच वर्षात त्याची पूर्तता होईल. अशी ग्वाही जाधव यांनी दिली. सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटी नागपूर शहरात ७२० कोटींचे सिमेंट रस्ते होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींच्या रस्त्यांचा समावेश आहे. यात राज्य सरकार व नागपूर सुधार प्रन्यास तसेच महापालिकेचा प्रत्येकी १०० कोटींचा वाटा आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. शाळांचा दर्जा सुधारणार महापालिके च्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. सोबतच अत्याधुनिक साधनांचा वापर केला जाईल. यासाठी शिक्षकांना कामाला लावणार असल्याचे जाधव म्हणाले. तलाव व चौकांचे सौंदर्यीकरण स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. विकासोबतच सौंदर्यीकरणही तितकेच महत्त्वाचे आहे. याचा विचार करता शहरातील बगिचे, तलाव व प्रत्येक चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद ठेवली जाणार आहे. करवसुलीसाठी व्यापक मोहीम महापालिकेची र्आिर्थक स्थिती विचारात घेता, कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील सर्व मालमत्तांवर कर आकारणी करून वसुली, तसेच जलप्रदाय, नगर रचना व बाजार विभागांच्या वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.