शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लेटलतिफांवर होणार का कारवाई ?

By admin | Updated: May 8, 2017 02:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांमधील कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात

प्रभारी कुलसचिवांनी घेतली गंभीर दखल : कुलगुरूंसोबत चर्चा करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांमधील कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात हे ‘लोकमत’ने छायाचित्रांसह प्रकाशित केल्यावर प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. सद्यस्थितीत कुलगुरू, कुलसचिव हे बाहेरगावी असले तरी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कर्मचाऱ्यांवर वचक आवश्यकच आहे व याबाबत कुलगुरूंसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठात अनेक विभागांतील कर्मचारी व अधिकारी वेळेत पोहोचतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र प्रतीक्षा करावी लागते. ‘लोकमत’ने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर रविवारी सुटी असूनदेखील कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा होती. नियमितपणे विद्यापीठाच्या वेळांचे पालन करणाऱ्यांनी या पुढाकाराचे स्वागतदेखील केले. यासंदर्भात डॉ. खटी यांना विचारणा केली असता नियमितता पाळणे हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्यच आहे. जर त्यात कसूर होत असेल आणि कर्मचारी जाणूनबुजून उशिरा येत असतील तर त्यांच्यावर वचक आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरु तसेच कुलसचिव परतल्यानंतर त्यांच्याशी यासंदर्भात चर्चादेखील करू, असे आश्वासन त्यांनी दिले. परीक्षा विभागातदेखील ‘बायोमेट्रिक’ प्रणाली खराब होती. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर येथे ‘मशीन्स’ बसविण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश कर्मचारी आता वेळेवर येत आहेत. जर कर्मचारी वेळेवर आले तर कारभारदेखील सुरळीतपणे चालतो, असे ते म्हणाले.