शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

सभागृहात मंत्री नसल्याने कामकाज तहकूब

By admin | Updated: December 15, 2015 05:02 IST

विरोधी पक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना सभागृहात

नागपूर : विरोधी पक्षातर्फे नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना सभागृहात महसूल, कृषी, मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे मंत्री वा राज्यमंत्री उपस्थित नव्हते. यावर संतप्त विरोधी सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा देत गोंधळ घातला. गोंधळामुळे तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृहात महसूल, कृषी, मदतकार्य व पुनर्वसन खात्याचे मंत्री वा राज्यमंत्री उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांच्यासह विरोधी सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. थोड्याच वेळात परिवहन मंत्री दिवाकर रावते व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट सभागृहात आले. त्यांनी महसूल मंत्री विधानसभेत उत्तर देत असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर गोंधळ शमला व पुन्हा चर्चेला सुरुवात झाली.(प्रतिनिधी)सरकार कमी पडणार नाहीराज्यातील २२ जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे ५० लाख शेतकरी संकटात आहेत. सरकारने शेतकऱ्यांना ८,५०० कोटींची मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांता मदत करताना सरकार कुठे कमी पडणार नाही, अशी ग्वाही सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी प्रस्तावावर बोलताना दिली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. परंतु कें द्र सरकारने केलेल्या ७० हजार कोटींच्या कर्जमाफीत राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ सात हजार कोटींचे कर्ज माफ झाले. याचा लाभ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रालाच झाला. शेतीसाठी पाणी, बाजारपेठ व मालाचे मार्केटिंग होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.