शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

९६५ कोटींनी वाढला नागनदी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील सिवरेजमुळे मृत अवस्थेतील नाग नदीचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील सिवरेजमुळे मृत अवस्थेतील नाग नदीचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, पुनरुज्जीवन महापालिका सभागृहात किती वेळा आला, या प्रश्नाचे उत्तर नगरसेवकही आता निश्चितपणे देऊ शकणार नाही. आठ वर्षांपूर्वी १२५२.३३ कोटींचा प्रकल्प आज २११७.७१ कोटीवर गेला आहे. जवळपास ९६५ कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चासोबतच महापालिकेवरील आर्थिक बोजाही वाढला आहे.

२०१२ मध्ये या प्रकल्पाची किंमत १२५२.३३ कोटी होती. केंद्र सरकारने या खर्चाला मान्यता दिली होती. प्रकल्पाला सुरुवात झाली नाही. सुधारित प्रस्तावानुसार २०१४ मध्ये प्रकल्पाची किंमत १४७६.९६ कोटींवर गेली. परंतु कामाला सुरुवात झाली नाही. २०१९ मध्ये १,८६४ कोटींवर हा प्रकल्प पोहोचला, आता तो २११७.७१ कोटींवर गेला आहे. केंद्रीय वित्त विभागाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या कामाला गती येईल, अशी आशा आहे.

राष्ट्र नदी विकास प्राधिकरण या प्रकल्पासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करणार आहे. सल्लागार कंपनीने तयार केलेला प्रस्ताव जपानची वित्तीय संस्था जिकाकडे तपासणीसाठी देण्यात येईल. जिकाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. यापूर्वी नाग नदीचा प्रस्ताव अनेकदा सभागृहात मंजुरीसाठी आला होता. प्रत्येक वेळेला मंजुरीही देण्यात आली, परंतु कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही.

....

वाढीव खर्चाचा मनपावर बोजा

जपानची वित्तीय संस्था जिका या प्रकल्पासाठी १ हजार ८६४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देणार आहे. २११७.७१ कोटींच्या या प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महापालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. त्यानुसार, २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. मात्र, प्रकल्पाची किंमत वाढल्यास महापालिकेला खर्च वहन करावा लागेल, असे जिकाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाच्या कामाला वर्ष-दोन वर्षे सुरुवात न झाल्यास प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता, हा वाढीव खर्च करणे शक्य होणार नाही.

......

प्रक्रिया न करता १८० एमएलडी सांडपाणी नदीत

शहराला दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी सुमारे ५३० एमएलडी पाणी सिवेजमध्ये परिवर्तित होऊन नदीत सोडले जाते. यातील ३५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर १८० सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. पुनरुज्जीवन झाल्यास नाग नदीला गतवैभव प्राप्त होईल. शहराच्या सौंदर्यात भर पडले. शहरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.