शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

जिल्हा परिषदेच्या ९० टक्के शाळेत ध्वजारोहण झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा दाखविण्यासाठी आपल्या घरावर ...

नागपूर : अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा दाखविण्यासाठी आपल्या घरावर ध्वजारोहण करता यावे, यासाठी कायदा करण्यात आला. दुसरीकडे देशाच्या ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण झाले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व नागपूर जि.प.च्या ९० टक्के शाळेत ध्वजारोहण झालेच नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळा या लहानपणापासून मुलांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांप्रति आदर, त्याग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सर्व इमारती ह्या सरकारी आहेत. सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात सरकारी इमारतीच्या ठिकाणी व परिसरात ध्वजारोहण झालेच पाहिजे, असा उल्लेख आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याच पत्राचा संदर्भ देत शिक्षकांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहावे, असे पत्र शाळांना पाठविले. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि स्वातंत्र्य दिनाला शाळेवर तिरंगा फडकलाच नाही. विशेष म्हणजे या आशयाचे पत्र महाराष्ट्रातील कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रामुळे घोळ निर्माण झाला आणि त्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ध्वजारोहणासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली नाही. त्यामुळे ध्वजारोहण करू नये, असा संभ्रम पसरला.

- शिक्षकांचा आग्रह; मुख्याध्यापकांनी दाखविले पत्र

काही शाळेतील शिक्षकांनी शाळेत ध्वजारोहण करण्याचा आग्रह मुख्याध्यापकांकडे केला. परंतु मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र दाखवून ध्वजारोहणास नकार दिला. विशेष म्हणजे या पत्रात शाळेत ध्वजारोहण करू नये, असा कुठलाही उल्लेख नव्हता.