शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

जिल्हा परिषदेच्या ९० टक्के शाळेत ध्वजारोहण झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

नागपूर : अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा दाखविण्यासाठी आपल्या घरावर ...

नागपूर : अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनी, गणतंत्र दिनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा दाखविण्यासाठी आपल्या घरावर ध्वजारोहण करता यावे, यासाठी कायदा करण्यात आला. दुसरीकडे देशाच्या ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण झाले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व नागपूर जि.प.च्या ९० टक्के शाळेत ध्वजारोहण झालेच नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळा या लहानपणापासून मुलांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांप्रति आदर, त्याग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सर्व इमारती ह्या सरकारी आहेत. सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात सरकारी इमारतीच्या ठिकाणी व परिसरात ध्वजारोहण झालेच पाहिजे, असा उल्लेख आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याच पत्राचा संदर्भ देत शिक्षकांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहावे, असे पत्र शाळांना पाठविले. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि स्वातंत्र्य दिनाला शाळेवर तिरंगा फडकलाच नाही. विशेष म्हणजे या आशयाचे पत्र महाराष्ट्रातील कुठल्याही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रामुळे घोळ निर्माण झाला आणि त्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी ध्वजारोहणासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली नाही. त्यामुळे ध्वजारोहण करू नये, असा संभ्रम पसरला.

- शिक्षकांचा आग्रह; मुख्याध्यापकांनी दाखविले पत्र

काही शाळेतील शिक्षकांनी शाळेत ध्वजारोहण करण्याचा आग्रह मुख्याध्यापकांकडे केला. परंतु मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र दाखवून ध्वजारोहणास नकार दिला. विशेष म्हणजे या पत्रात शाळेत ध्वजारोहण करू नये, असा कुठलाही उल्लेख नव्हता.