शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेला ८८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्याने विद्यार्थी कमी संख्येत राहतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात ८८ टक्के विद्यार्थ्यानी परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा दिली. काही ठिकाणी विद्यार्थी मास्कविना होते, त्यामुळे काही जणांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, शाळा बंदच असताना ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा आग्रह का होता, असा सवाल पालकांनी उपस्थित केला.

नागपूर जिल्ह्यातील १८ हजार २८२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ५० टक्के विद्यार्थीच उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात १६ हजार ६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही टक्केवारी ८७.८६ टक्के इतकी होती. पाचवीचे ११ हजार ७६ पैकी ९ हजार ७०० विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवीच्या ७ हजार २०६ पैकी ६ हजार ३६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा शांततेत पार पडली. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परीक्षा केंद्रांवर काही विद्यार्थी विना मास्क असल्याने पालकांनी आक्षेप घेतला.

परीक्षा केंद्रांची संख्या वाढविली

कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखणे अनिवार्य होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली होती. पाचवीसाठी जिल्ह्यात ९९ तर आठवीसाठी ७४ केंद्र होते.

पालकांची संतप्त प्रतिक्रिया

शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत राज्य शासनामध्येच संभ्रम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशा स्थितीत शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन घ्यायचा आग्रह का होता, असा सवाल पालकांनी केला. शाळेत गेल्याने कोरोना होतो व शिष्यवृत्ती परीक्षा दिल्याने होत नाही, असे काही संशोधन आहे का अशी उपरोधात्मक प्रतिक्रियादेखील काही पालकांनी दिली. बहुतांश पालक पूर्णवेळ परीक्षा केंद्रांबाहेर उभे होते.