शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

६ महिन्यांत डेंग्यूचे ७९ रुग्ण

By admin | Updated: October 30, 2014 00:49 IST

मागील काही दिवसांपासून उपराजधानीप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील डेंग्यूचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या ६ महिन्यांत डेंग्यूचे

नागपूर : मागील काही दिवसांपासून उपराजधानीप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील डेंग्यूचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या ६ महिन्यांत डेंग्यूचे ७९ संशयित रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात विचारणा केली होती. यातील माहितीनुसार १ एप्रिल २०१४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत डेंग्यूचे २१४ संशयित रुग्ण आढळून आले व ९ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०१० पासून साडेचार वर्षांत ३८७ संशयित रुग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाल्याची बाब या माहितीच्या अधिकारात नमूद करण्यात आली आहे.मलेरियाचे प्रमाण घटतेयडेंग्यूप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मलेरियाच्या रुग्णांची माहिती मागविण्यात आली होती. १ एप्रिल २०१४ ते ३० सप्टेंबर या ६ महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचे १५६ संशयित रुग्ण आढळून आले, मागील वर्षी हेच प्रमाण २४३ इतके होते. एप्रिल २०१० पासून एकूण संशयित रुग्णांचा आकडा २०८२ इतका आहे. परंतु दरवर्षी संशयित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)