शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या तुलनेत ७० टक्के विमान प्रवासी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत आता विमान प्रवाशांची संख्या ७० ते ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत आता विमान प्रवाशांची संख्या ७० ते ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या २४ ते २७ विमाने उड्डाण करीत असून तेवढीच येत आहेत. मार्चनंतर ही संख्या ३४ ते ३७ विमानांवर जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनपूर्वीची स्थिती विमानतळावर येण्यासाठी व्यवस्थापनाला अधिक परिश्रम घ्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

अनलॉकनंतर विमानतळावर वाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. सध्या एअर इंडिया, इंडिगो आणि गो एअर विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. जानेवारी महिन्यात १.५९ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती आहे. यावरून अंदाज येत आहे. विमान कंपन्यांना निरंतर प्रवासी संख्या मिळत नसल्याने कंपन्यांचे व्यवस्थापन अहमदाबाद, बेंगळुरू आणि कोलकाता विमानांच्या वेळापत्रकात निरंतर बदल करताना दिसून येत आहे. अहमदाबादकडे कधी मोठ्या तर कधी लहान विमानांनी सेवा देण्यात येत आहे.

विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दर महिन्यात वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्ये घरगुती विमान सेवेंतर्गत १,२०,३०९ प्रवाशांची ये-जा होती. डिसेंबरमध्ये ही संख्या १,५०,०१६ वर पोहोचली. तुलनात्मकरीत्या लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये ही संख्या २,६२,१९१ एवढी होती. या हिशोबाने लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत सध्या प्रवाशांची ये-जा ६४ टक्केच आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये विमानांची १,७५६ उड्डाणे झाली. ती डिसेंबरमध्ये १,३०३ पर्यंत कमी झाली. अर्थात त्यात ३० टक्के घसरण झाली.

देशांतर्गत एक वा दोन शहरे सोडली तर सर्व शहरांसाठी विमान सेवा सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, इंदुर, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, गोवाकरिता नियमित उड्डाणे आहेत. सध्या सर्वाधिक उड्डाणे मुंबई आणि दिल्लीकडे होत आहेत. सध्या सर्व उड्डाणांद्वारे पाच ते साडेपाच हजार प्रवासी ये-जा करीत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू नसल्याने प्रवाशांच्या संख्येत घट दिसून येत आहे. पूर्वी विमानतळावरून शारजाह आणि दोहाकरिता विमानसेवा सुरू होती. ही दोन्ही उड्डाणे सुरू झाल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.

मार्चनंतर उड्डाणे आणि प्रवासी संख्या वाढणार

सध्या तीन विमान कंपन्यांची उड्डाणे होत आहेत. नियमित २४ ते २७ उड्डाणे आहेत. ही संख्या मार्चनंतर वाढण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांनी नवीन मार्गावर उड्डाणांसाठी संपर्क साधला आहे. सध्या ७० टक्क्यांपर्यंत प्रवाशांची संख्या आहे. पूर्ण उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

- आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.