शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

नागपुरात नऊ महिन्यांत ६४ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 15:34 IST

गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदीड हजारांहून अधिक आत्महत्याघरफोडी, चेनस्नॅचिंगमध्ये घट, एकूण गुन्हे मात्र वाढले

आॅनलाईन लोकमतनागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीच्या नऊ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. तर या कालावधीत दीड हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. दरदिवसाला सरासरी पाच जणांनी जीव दिला असल्याचे आकडेवारी सांगत आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, आत्महत्यांचे प्रमाण, बलात्कार इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ७,२३७ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ४,२३७ आरोपींना अटक करण्यात आली. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत ६,३७९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यंदा खुनांचे ६४ गुन्हे दाखल झाले. ७ महिला, ४८ पुरुष तर ९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले.दरोडे घटले, फसवणूक वाढली४दरम्यान, शहरात दरोड्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात १७ दरोड्यांची नोंद झाली होती. यंदा हा आकडा आठवर आला असून यात २७ आरोपींना अटक झाली आहे. सोबतच ‘चेनस्नॅचिंग’चे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत १३४ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा सप्टेंबरअखेरीस हा आकडा ७२ इतका होता. मात्र फसवणुकीमध्ये वाढ झाली आहे. यंदा नऊ महिन्यात फसवणुकीचे ३४८ गुन्हे दाखल करण्यात आले. मागील वर्षी आॅगस्टपर्यंत हीच संख्या २६४ इतकी होती. बलात्कार कमी कधी होणार ?४महिला सुरक्षेचे पोलीस प्रशासनातर्फे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात बलात्कारांच्या घटनांमध्ये फारशी घट झालेली नाही. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात बलात्काराचे १२२ गुन्हे दाखल झाले. यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली.