शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

१११५ मतदान केंद्रावर ६,१६,०१६ मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, ६,१६,०१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेतून निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.

निवडणुकीसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी व १३ सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी ४,९०८ मनुष्यबळ लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या घेतलेल्या आढाव्यात १०९७ मतदान केंद्र सुस्थितीत आहेत. उर्वरित मतदान केंद्र लवकरच सुरळीत करण्यात येणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून लागली असून, २० जुलैला संपणार आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी एसएसटीचे २५, एफएसटीचे २६, व्हीएसटी २९ व व्हीव्हीटीचे १७ पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा तीन लाख तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये आहे. उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम खुल्या गटातील उमेदवारासाठी १००० रुपये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७०० रुपये आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारासाठी जिल्हा परिषद ५०० व पं.स.ला ३५० रुपये आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाईन संकेतस्थळावर सादर करायचे आहे. निवडणुकीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ७ ते १८ जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

- सभेसाठी ५० व घरोघरी प्रचारासाठी ५ लोकांना परवानगी

निवडणूक आयोगाने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने प्रचाराच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. उमेदवाराला सभा व बैठकांसाठी ५० लोकांची परवानगी आहे, तर घरोघरी प्रचार करायचा असेल तर ५ लोकांना सोबत ठेवता येणार आहे. त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. जमावबंदी व संचारबंदी लागू असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच प्रचार करावा लागणार आहे. १७ जुलै रोजी प्रचार थांबणार आहे.

- पहिल्या दिवशी शून्य अर्ज

मंगळवारपासून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. ५ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करायचे आहेत.