शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

१११५ मतदान केंद्रावर ६,१६,०१६ मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागेसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १११५ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून, ६,१६,०१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेतून निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.

निवडणुकीसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी व १३ सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी ४,९०८ मनुष्यबळ लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या घेतलेल्या आढाव्यात १०९७ मतदान केंद्र सुस्थितीत आहेत. उर्वरित मतदान केंद्र लवकरच सुरळीत करण्यात येणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता २२ जूनपासून लागली असून, २० जुलैला संपणार आहे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी एसएसटीचे २५, एफएसटीचे २६, व्हीएसटी २९ व व्हीव्हीटीचे १७ पथक तैनात करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा तीन लाख तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये आहे. उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम खुल्या गटातील उमेदवारासाठी १००० रुपये जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७०० रुपये आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारासाठी जिल्हा परिषद ५०० व पं.स.ला ३५० रुपये आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाईन संकेतस्थळावर सादर करायचे आहे. निवडणुकीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ७ ते १८ जुलैदरम्यान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

- सभेसाठी ५० व घरोघरी प्रचारासाठी ५ लोकांना परवानगी

निवडणूक आयोगाने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने प्रचाराच्या मर्यादा घालून दिल्या आहेत. उमेदवाराला सभा व बैठकांसाठी ५० लोकांची परवानगी आहे, तर घरोघरी प्रचार करायचा असेल तर ५ लोकांना सोबत ठेवता येणार आहे. त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. जमावबंदी व संचारबंदी लागू असल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच प्रचार करावा लागणार आहे. १७ जुलै रोजी प्रचार थांबणार आहे.

- पहिल्या दिवशी शून्य अर्ज

मंगळवारपासून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. ५ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करायचे आहेत.