शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

तेंदूपत्ता हंगामात पंधरा दिवसात ६ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

नागपूर : जंगलामधील तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी आणि आदिवासींना जोखमीशी सामना करावा ...

नागपूर : जंगलामधील तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी आणि आदिवासींना जोखमीशी सामना करावा लागत आहे. मागील १५ दिवसात विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात ६ व्यक्तींचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यातील चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू एकाच दिवशी झाल्याने हा विषय अधिक संवेदनशील ठरला आहे. तर मागील वर्षीच्या तेंदूपत्ता हंगामात ७ व्यक्तींचा मृत्यू विदर्भात झाल्याची नोंद आहे.

यंदा तेंदूपत्ता हंगामात वन्यजीवांच्या हल्ल्यात ६ व्यक्ती ठार झाले. यातील तीन घटना गडचिरोली जिल्ह्यातील असून तीन घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. आरमोरी तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रात १८ मे रोजी एक महिला वाघाच्या हल्लात ठार झाली. याच आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात १९ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात तीन घटनांची नोंद आहे. भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा, चिमूर तालुक्यातील पेंढरी-कोकेवाडातील एक महिला आणि सावली तालुक्यातील निफंद्रा गावातील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

२०२० च्या तेंदूपत्ता हंगामातही ७ मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात गडचिरोली ३, गोंदिया २ आणि भंडारा व नागपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक घटना घडल्याची माहिती आहे. यातील मृतांच्या वारसांना मिळणारी नुकसानभरपाई कोरोना संक्रमणामुळे रखडल्याची माहिती आहे.

...

वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष

या दिवसातील हा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आहेत. तेंदूपत्ता तोडाईला मिळून जा, सकाळी लवकर जाऊ नका अशा सूचना आहेत. मात्र अधिक तेंदूपत्ता मिळावा यासाठी कुटुंबातील मोजके सदस्य मिळून जातात. तेंदूपाने तोडताना बराच वेळ वाकून राहू नये. एकमेकांशी सारखे बोलत राहावे, वनात डोक्यामागे मुखवटा घालून चालावे, खांद्यावर जमिनीस समांतर काठी घेऊन चालावे, असे उपायही यापूर्वी सुचविण्यात आले आहेत.

...

तेंदूपत्ता हंगामातील मृत्यूच्या घटना

जिल्हे - वर्ष २०२० - वर्ष २०२१

गडचिरोली : ३ मृत्यू - ३ मृत्यू

गोंदिया : २ मृत्यू, ३ जखमी - निरंक

भंडारा : १ मृत्यू - निरंक

नागपूर : १ मृत्यू - निरंक

चंद्रपूर : ... - ३ मृत्यू

...

घटनांमध्ये दरवर्षी वाढ

एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०१० ते मे २०२१ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २५८ जणांचा मृत्यू झाला. मार्च ते १८ मे २०२१ पर्यंत महिन्यात ९ जणांचा बळी गेला. २०१६ पासून वन्यप्राण्यांकडून हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी ताडोबा व्याघ प्रकल्प क्षेत्रालगतची गावे आणि ब्रह्मपुरी उपवन क्षेत्रात घटना घडायच्या. आता राजुरा, गोंडपिपरी, चिमूर, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही परिसरातही घटना वाढल्या आहेत. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या मर्यादित होती. दोन वर्षात आरमोरी, वडसा-देसाईगंज, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातही वाघांचा वावर वाढल्याने तेंदूपत्ता हंगामातील वाघ आणि अन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.

...