शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

६ जिल्हे होणार ‘पाणीदार’, वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार ...

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे. केवळ सिंचनच नव्हे तर, पेयजल, उद्योग, मत्स्योत्पादन, जलऊर्जा निर्मिती, पर्यटन, कृषी उत्पादकता अशा सर्व माध्यमातून हे उत्पन्न वाढण्यासोबतच रोजगार निर्मिती वाढविण्याचे नियोजन आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यातील १५ तालुके सिंचनाच्या बाबतीत सधन होतील, यातून विदर्भाची अर्थव्यवस्था सुधारेल असे नियोजन आहे.

या नदीजोड प्रकल्पातून ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, हिंगणा आणि नागपूर या चार तालुक्यातील ९२,३२६ हेक्टर शेतीला सिंचनाला लाभ मिळणार आहे. या सोबतच, वर्धा जिल्ह्यात सेलू, आर्वी व वर्धा तालुक्यात ५६,६४६ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात धामणगाव, नांदगाव (खं.) तालुक्यात ८३,५७१ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात नेर व बाभूळगाव तालुक्यात १५,८९५ हेक्टर, अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात ८४,६२५ हेक्टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आणि मोताळा तालुक्यात ३८,२१४ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पातून वर्षाला १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पाचही तालुक्यातील पीकपद्धती वेगळी आहे. आज सिंचनाच्या सुविधांअभावी पुरेसे उत्पादन घेता येत नाही. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांमुळे तर अकोला जिल्हा दुष्काळामुळे चर्चेत आहे. या नदीजोड प्रकल्पातून संत्री, कॉटनबेल्टला नवसंजीवनी मिळू शकते. शेतीच्या उत्पादनातून अन्य प्रक्रिया उद्योग भविष्यात उभारले जाऊन त्यातून मोठी रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे. पर्यटनवाढीला चालना देण्यासोबतच पाण्यामुळे अडलेला औद्योगिक विकासही साधला जाऊ शकतो. प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकते.

...

आराखडा तयार, निधीची प्रतीक्षा

या प्रकल्पाचा आराखडा २०१८ पासून तयार आहे. आता मंजुरीची आणि निधीची तेवढी प्रतीक्षा आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रकल्पाची किमतही वाढणार असल्याने राज्य सरकार आणि जनप्रतिनिधी कधी मनावर घेणार, हे आता महत्त्वाचे आहे.

...

* लाभक्षेत्रातील पिके

नागपूर जिल्हा - सोयाबीन, कापूस

वर्धा जिल्हा-कापूस, सोयाबीन, केळी, (सेलूमध्ये संत्री, मोसंबी), भाजीपाला

अमरावती जिल्हा-संत्री, कापूस

यवतमाळ जिल्हा-कापूस

अकोला जिल्हा-कापूस, सोयाबीन

बुलढाणा जिल्हा-कापूस, ज्वारी, उन्हाळी कांदा

...

* तालुके व सिंचनाचा लाभ

नागपूर जिल्हा ९२,३२६ हेक्टर : कुही (४४,२५४ हे.), उमरेड (३३,५५८ हे.), हिंगणा (९,६९७ हे.), नागपूर (४,८१७ हे.)

वर्धा जिल्हा ५६, ६४६ हेक्टर : सेलू (२४, ३४९ हे.), आर्वी (३०,६५९ हे.), वर्धा (१,६३८ हे.)

अमरावती जिल्हा ८३,५७१ हेक्टर : धामनगाव (३३,६०४ हे.), नांदगाव (खं.) (४९,९७६ हे.)

यवतमाळ जिल्हा १५,८९५ हेक्टर : नेर (४,९९८ हे.), बाभूळगाव (१०,८९७ हे.)

अकोला जिल्हा ८४,६२५ हेक्टर : बार्शी टाकळी (५०,७५६ हे.), अकोला (३३,८६९ हे.)

बुलढाणा जिल्हा ३८, २१४ हेक्टर : शेगाव (३०,०४४ हे.), मोताळा (८,१७० हे.)

...

* उत्पन्नाचे वार्षिक स्त्रोत

कृषी उत्पादन - २,१३३ कोटी ८१ लाख रु.

पाणी कर (सिंचन सेवा शुल्क) - ५,५६९ कोटी रु.

पेयजल पाणीपुरवठा - ११२ कोटी रु.

औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरठा-९५ कोटी २८ लाख रु.

मासेमारी-३२ कोटी ३० लाख रु.

कॅनल प्लँटेशन - ४८ कोटी ६६ लाख रु.

जलऊर्जा निर्मिती- १८८४ मे.व्हॅ.

एकूण प्रस्तावित उत्पन्न-११,७९९ कोटी ५२७ लाख रु.

...

* लिंकमधून पाण्याचा वार्षिक वापर

सिंचन - १२८६ द.ल.घ.मी.

पाणीपुरवठा योजना - ३२ द.ल.घ.मी.

औद्योगिकरण - ३९७ द.ल.घ.मी.

प्रस्तावित वार्षिक वापर - १,७७२ द.ल.घ.मी.

...