शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

चार महिन्यात खर्च होणार ५६९ कोटी रुपये ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या काळात ठप्प पडलेल्या विकास कामांना पुन्हा गती देण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या काळात ठप्प पडलेल्या विकास कामांना पुन्हा गती देण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत पुढील चार महिन्यात ५६९ कोटी रुपये खर्च करून विकास कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात ४०० कोटी रुपये सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजनेचे १२७ कोटी आणि आदिवासी उपयोजनेच्या ४२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी या वित्तीय वर्षात शेवटच्या चार महिन्यात पूर्ण निधी खर्च करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनमध्ये आयोजित बैठकीत वर्ष २०१९-२० पर्यंतच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. यासोबतच २०२०पर्यंत मिळालेला निधी, वितरण व खर्चाचा आढावा सुद्धा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी शहर व जिल्ह्यातील इतर भागांसाठी आवश्यक योजनांची माहितीही घेतली.

नियोजन विभागाने जिल्हास्तरीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आयपास यंत्रणेद्वारा प्रस्ताव देणे आवश्यक करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात या नवीन यंत्रणेने प्रस्ताव येणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही विभागाने या वर्षाचा निधी पुढच्या वर्षासाठी वापरू नये, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी केले.

बॉक्स

काय-काय होणार

उपलब्ध निधी हा पालकमंत्री विद्यार्थी साहायता निधी, पालकमंत्री आपत्ती साहाय्यता निधी, पालकमंत्री जन आरोग्य योजना, दीक्षाभूमीचा विकास , दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी येणाऱ्या अनुयायांच्या सुविधा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना, दुग्ध विकास योजना, शाळा सक्षमीकरण, वाचनालये, तसेच भारतीय प्रशासनिक सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रालाही आधुनिक केले जाईल.

बॉक्स

एकही आमदार नाही

या बैठकीत प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. परंतु एकही आमदार उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या आयुक्त शीतल उगले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर आदी उपस्थित होते. बैठकीत एकही आमदार उपस्थित नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.