शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा हळूहळू शतकाजवळ पाेहाेचत असून, काेराेनाने आजवर तालुक्यातील ८७ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात काटाेल शहरातील ५६, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे काेराेना संक्रमण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. वेळीच चाचणी न करणे आणि आजारपण लपवून अंगावर काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. त्यामुळे संक्रमणाचा वेग कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आजवर ६,७२६ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात २,९७३ नागरिक काटाेल शहरातील व २,७५३ नागरिक तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. यातील ४,२७८ रुग्णांनी काेराेनावर समर्थपणे मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये २,७३२ रुग्ण काटाेल शहरातील, तर १,५४६ रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. सध्या १,१८५ शहरी व १,१७६ ग्रामीण भागातील अशा एकूण २,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काेराेना संक्रमणाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने लसीकरण माेहीम युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली. तालुक्यात आजवर ३३,८१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १०,३२३ काटाेल शहरातील तर २३,४९३ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वांनी स्वतःच्या पातळीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन व्यवहार करावे, असे आवाहन आपत्ती निवारण समिती प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डॉक्टर शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश डवरे, शिक्षणाधिकारी दिनेश धवड, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके यांनी केले आहे.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

एकीकडे काेराेना संक्रमण आणि त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे प्रशासनाची हतबलता आणि नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असून, अख्ख कुटुंब आणि गाव संक्रमित हाेत आहे. वारंवार सूचना देऊन, आवाहन करूनही नागरिक आठवडी बाजार भरवणे, राेडवर विनाकारण फिरणे, गर्दी करणे, कुठेही थुंकणे, मास्क न वापरणे यांसारख्या साध्या बाबींवर नागरिक अंमल करायला तयार नाही.