शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५६, तर ग्रामीण भागात ३१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. काटाेल तालुक्यातील मृत्यूदर हा हळूहळू शतकाजवळ पाेहाेचत असून, काेराेनाने आजवर तालुक्यातील ८७ रुग्णांचा बळी घेतला आहे. यात काटाेल शहरातील ५६, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे काेराेना संक्रमण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दिली. वेळीच चाचणी न करणे आणि आजारपण लपवून अंगावर काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. त्यामुळे संक्रमणाचा वेग कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आजवर ६,७२६ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात २,९७३ नागरिक काटाेल शहरातील व २,७५३ नागरिक तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. यातील ४,२७८ रुग्णांनी काेराेनावर समर्थपणे मात केली आहे. मात करणाऱ्यांमध्ये २,७३२ रुग्ण काटाेल शहरातील, तर १,५४६ रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. सध्या १,१८५ शहरी व १,१७६ ग्रामीण भागातील अशा एकूण २,३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काेराेना संक्रमणाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने लसीकरण माेहीम युद्धपातळीवर राबवायला सुरुवात केली. तालुक्यात आजवर ३३,८१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १०,३२३ काटाेल शहरातील तर २३,४९३ तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वांनी स्वतःच्या पातळीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन व्यवहार करावे, असे आवाहन आपत्ती निवारण समिती प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डॉक्टर शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश डवरे, शिक्षणाधिकारी दिनेश धवड, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके यांनी केले आहे.

...

नागरिकांचा बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर

एकीकडे काेराेना संक्रमण आणि त्यामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे प्रशासनाची हतबलता आणि नागरिकांचा बेजबाबदारपणाही दिसून येत आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असून, अख्ख कुटुंब आणि गाव संक्रमित हाेत आहे. वारंवार सूचना देऊन, आवाहन करूनही नागरिक आठवडी बाजार भरवणे, राेडवर विनाकारण फिरणे, गर्दी करणे, कुठेही थुंकणे, मास्क न वापरणे यांसारख्या साध्या बाबींवर नागरिक अंमल करायला तयार नाही.