शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

५०० रुपयांच्या वादातून घडले हत्याकांड

By admin | Updated: April 11, 2015 02:17 IST

५०० रुपयांच्या वसुलीतून निर्माण झालेल्या वादामुळे सक्करदऱ्यातील तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली

आरोपींनी उगवला सूड : चौघांना अटकनागपूर : ५०० रुपयांच्या वसुलीतून निर्माण झालेल्या वादामुळे सक्करदऱ्यातील तिहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मारेकऱ्यांनी उगले बंधूंपैकी एकाच्या हत्येचा कट रचला होता. परंतु, भावाला वाचविण्यासाठी संजय आणि केशव मारेकऱ्यांसमोर उभे झाल्याने मारेकऱ्यांनी या तिघांनाही निर्दयपणे ठार मारले.एकनाथ काशिनाथराव उगले (वय ३२), संजय काशिनाथराव उगले (वय ३०) आणि केशव काशिनाथराव उगले (वय २७, रा. सर्व शामबाग, सक्करदरा) या तिघांची १० ते १२ जणांनी गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण हत्या केली. उपराजधानीला हादरवून सोडणारे हे हत्याकांड केवळ ५०० रुपयांच्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे. मृत एकनाथ हा पान सेंटरच्या मागे जुगार क्लब चालवत होता. संजय कोंबड्यांची झुंज लावायचा तर, केशव हा हिंगण्यातील एका दारूच्या भट्टीवर बसायचा.आरोपी शुभम सातपैसे, निहाल नागोसे, रामा नागोसे भाजी विकायचे. जुगारातील ५०० रुपयांवरून एकनाथने रामाला दोन दिवसांपूर्वी चौकात मारहाण केली होती. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीलाही एकनाथने धक्काबुक्की केली. मोहल्ल्यातील नागरिकांसमोर झालेल्या या अपमानामुळे रामा, निहाल आणि त्याचे साथीदार सूडाने पेटले होते. या घटनेनंतर गुरुवारी शक्ती पांडेच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम असल्यामुळे उपरोक्त आरोपी, एकनाथ, संजय आणि केशव तसेच परिसरातील काही नागरिक आणि गुंडही भंडारा मार्गावर गेले होते. तेथे खाणेपिणे सुरू असतानाच जुगारही भरला. या जुगारात शुभम आणि निहालसोबत पुन्हा एकनाथचा वाद झाला. यावेळी संजयने आरोपींना मारहाण केली. वेळोवेळी होणारी मारहाण आणि अपमानामुळे क्षुब्ध झालेले आरोपी तेथून नागपुरात परतले आणि त्यांनी रस्त्यातच एकनाथच्या हत्येचा कट रचला. तो परत येण्याची आरोपी वाट बघू लागले. रात्री ९ च्या सुमारास एकनाथ, संजय आणि केशव पान सेंटरजवळ आले. शस्त्रानिशी तयारीत असलेल्या आरोपींनी एकनाथवर धाव घेतली. मात्र, केशव पुढे झाला. त्यामुळे आरोपींनी प्रथम त्याच्यावर आणि त्याच्या मदतीला धावलेल्या एकनाथ आणि संजयवरही शस्त्राचे सपासप घाव घालून ठार मारले. आरोपी मोठ्या संख्येत असल्यामुळे उगले बंधूंना बचावाची संधीच मिळाली नाही. ते तिघे रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी पळून गेले. या हत्याकांडामुळे अवघ्या उपराजधानीला हादरा बसला. हा टोळीयुद्धाचा प्रकार असल्याचीही चर्चा सुरू झाली. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.दरम्यान, सक्करदरा पोलिसांनी मृताची आई मनोरमाबाई काशीनाथराव उगले (वय ६०) यांच्या तक्रारीवरून नेहाल धनराज नागोसे, रामेश्वर ऊर्फ रामा बाबूराव नागोसे, भूषण बहाट ऊर्फ बाल्या मांजरे, राजू बाबूराव नागोसे, शुभम सातपैसे, मनोज सोनटक्के आणि शुभम सोनटक्के यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. यातील नेहाल, रामा, बाल्या आणि राजू नागोसे या चौघांना अटक करण्यात आली. इतरांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)