शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

सात वर्षांत ५० वाघांचा मृत्यू!

By admin | Updated: July 29, 2015 02:50 IST

जाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे.

वाघांच्या संवर्धनासाठी आज ‘ग्लोबल टायगर डे’ साजरा करणारजाणकारांच्या मते, सध्या जगातील भारतासह केवळ ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया याच देशातील जंगलात वाघाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. इतर सर्व देशातील वाघ प्राणिसंग्रहालयात पोहोचले आहेत. जंगली वाघांपैकी ५० टक्के वाघ भारतात आहे. मात्र असे असले, तरी भारतातील वाघसुद्धा आज दुर्मिळ होत चालला आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये सर्वांधिक म्हणजे, १३ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सात वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून, तीन वाघांचा अपघाती व तीन वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. अशाप्रकारे मागील सात वर्षांत एकूण ३० वाघांचा नैसर्गिक, ११ वाघांचा अपघाती व ९ वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. यावर्षी २३ एप्रिल ते २९ जूनदरम्यान एकाच चंद्रपूर जिल्ह्यात चार वाघांचा मृत्यू झाला. शिवाय एका वाघाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. सहा महिन्यात पाच वाघांच्या या मृत्यूने अक्षरश: वन विभाग हादरला आहे. यात वाघाच्या मृत्यूची पहिली घटना १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील दौलाखेडा येथील कम्पार्टमेंट क्र. ५७२ मध्ये उघडकीस आली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा डिव्हिजनमध्ये २३ एप्रिल रोजी जुनोना रेंजमधील कम्पार्टमेंट क्र. ४७६ मध्ये दुसरी घटना, ब्रम्हपुरी डिव्हिजनमधील तळोधी रेंजमध्ये तिसरी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात चौथी व सिंदेवाही रेंजमधील काघाटा येथील कम्पार्टमेंट क्र. १६८ मध्ये पाचवी घटना उघडकीस आली. या घटना रोखण्यात वन विभाग अपयशी ठरत आहे. वाघाप्रमाणेच बिबट हासुद्धा जंगलातील महत्त्वाचा प्राणी समजल्या जातो. परंतु अलीकडे बिबटसुद्धा नामशेष होऊ लागला आहे. मागील सहा वर्षांत राज्यातील ३२४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २००९ मध्ये ४८, २०१० मध्ये ५७, २०११ मध्ये ७०, २०१२ मध्ये ६८, २०१३ मध्ये ४३ व २०१४ मध्ये ३८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज वाघासोबतच बिबट्यांनाही वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे.वाघाला तस्करांचा धोका साधारण २० व्या शतकाच्या सुरुवातीला देशात एक लाखांपेक्षा अधिक वाघांचा अधिवास होता. परंतु इंग्रज देश सोडून जाताना ती संख्या ४० हजारांपर्यंत खाली आली. दरम्यान हौस म्हणून वाघाची शिकार केली जात होती. ब्रिटिश देश सोडून गेल्यावरही देशात तोच प्रघात कायम होता. वाघांची ती चिंताजनक परिस्थिती पाहून काही वन्यजीव रक्षकांनी अशा हौशी शिकारीविरुद्ध आवाज उठविला होता. तसेच ‘टायगर प्रोजेक्ट’ हा वन्यजीव संवर्धन कार्यक्रमातील सर्वांत यशस्वी टप्पा मानल्या जातो. या माध्यमातून अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले, तसेच अनेक राष्ट्रीय उद्यानांची घोषणा करण्यात आली. या व्याघ्र प्रकल्पानंतर सामान्य नागरिकांचा वन्यजीवांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ निर्माण होऊ लागली. परिणामत: १९९० मध्ये देशातील वाघांची संख्या साडे चार ते पाच हजारांपर्यंत पोहोचली. परंतु याचवेळी आंतरराष्ट्रीय तस्कारांचे पुन्हा वाघांकडे लक्ष वेळले. यातून शिकारींचे प्रमाण वाढले आणि २००८ पर्यंत देशात केवळ १३०० वाघ शिल्लक राहिले.