शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

आरटीईच्या प्रतिपुर्तीत ५० टक्के कपात, पालकांकडून मात्र १०० टक्के फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के ...

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के फी वसुली का, असा सवाल पालकांनी राज्य सरकारकडे केला आहे. शाळा जर ऑनलाईन असेल तर आम्हालाही फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली .

गेल्या वर्षभरापासून पालक व शाळा व्यवस्थापनात स्कूल फी वरून सातत्याने वाद सुरू आहे. प्रशासन पालकांचे समाधान करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन शाळांकडून होत नाही. शाळांनी ‘पीटीए’ चा गैरवापर केला आहे. सर्व शाळा चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत असल्याने शाळांनी आपले फायनान्शियल ऑडिट सादर करणे गरजेचे आहे. शाळांची मनमानी सुरू असून, फी न भरू शकलेल्या पालकांच्या पाल्यांच्या टीसी शाळेने घरी पाठविले आहे. न्यायालयाचे निर्देश शाळा पाळत नाही, सीबीएसईच्या गाईडलाईन पाळत नाही. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाकडे पाठ दाखविली जाते, असे असताना अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे पालक संघटना आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पत्रपरिषदेला पंकज गुल्हाने, अजय चालखुरे, अमित होशिंग, अ‍ॅड. पवन सहारे, अभिषेक जैन, संदीप अग्रवाल, संजय शर्मा, गिरीश पांडे आदी उपस्थित होते.