शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

४५८ कोटींसाठी सरकारकडे साकडे

By admin | Updated: August 18, 2015 03:31 IST

शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व

नागपूर : शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदी व नाल्याकाठावरील वस्त्या जलमय होतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याने नद्या व नाल्यांची दुरुस्ती तसेच संरक्षण भिंती उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ४५८ कोटीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी दिली.१३ आॅगस्टला २०१३ सालची पुनरावृत्ती झाली. २४ तासात तब्बल १६४ मि.मी. पाऊ स झाल्याने शहरातील तलाव ओव्हर फ्लो झाले. नद्या व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठावरील व सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या. पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली होती. अग्निशमन विभागाच्या बचाव पथकांच्या माध्यमातून समतानगर येथील ३५ व भरतवाडा येथील ४० लोकांना बाहेर काढण्यात आले. हुडकेश्वर येथील पोहरा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील ४२ लोक ांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होेते. विस्थापितांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.पालकमंत्र्यांनी शहरातील नुकसानीचा अहवाल मागितला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने केलेल्या सर्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार नुकसान दर्शविण्यात आले आहे. आपत्ती ग्रस्तांना र्आिर्थक मदतीची गरज आहे. ती शासनाकडून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरामुळे ६० कोटींचे नुकसान४१३ आॅगस्टला नागपूर शहरात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे ४१६ कुटुंब विस्थापीत झाली. ४८६ लोकांना पुरातून वाचविण्यात आले. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. मालमत्ताचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ५९.६२ कोटीचे नुकसान झाले आहे. या बाबतचा अहवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आल्याची माहिती दटके यांनी सोमवारी दिली.नुकसानग्रस्त वस्त्या४शहरातील समतानगर, कस्तुरबानगर, रिमानगर, गोदवारीनगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्यनगर, वेलेनगर, पाडुरंगनगर, काचीपुरा, सोनियानगर, वनदेवीनगर, संघर्षनगर, पांढराबोडी,भरतवाडा, हुडकेश्वर(पिपळा फाटा) गोरेवाडा, मानकापूर, गुलशननगर, विटभट्टी, अंबाझरी कॉलनी आदी वस्त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.