शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

४५८ कोटींसाठी सरकारकडे साकडे

By admin | Updated: August 18, 2015 03:31 IST

शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व

नागपूर : शहरातून नाग, पिवळी व पोहरा अशा तीन प्रमुख नद्या वाहतात. तसेच लहान नाल्यांची संख्या मोठी आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नदी व नाल्याकाठावरील वस्त्या जलमय होतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याने नद्या व नाल्यांची दुरुस्ती तसेच संरक्षण भिंती उभारण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे ४५८ कोटीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी दिली.१३ आॅगस्टला २०१३ सालची पुनरावृत्ती झाली. २४ तासात तब्बल १६४ मि.मी. पाऊ स झाल्याने शहरातील तलाव ओव्हर फ्लो झाले. नद्या व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठावरील व सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या होत्या. पुरात वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली होती. अग्निशमन विभागाच्या बचाव पथकांच्या माध्यमातून समतानगर येथील ३५ व भरतवाडा येथील ४० लोकांना बाहेर काढण्यात आले. हुडकेश्वर येथील पोहरा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील ४२ लोक ांना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होेते. विस्थापितांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.पालकमंत्र्यांनी शहरातील नुकसानीचा अहवाल मागितला होता. त्यानुसार मनपा प्रशासनाने केलेल्या सर्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार नुकसान दर्शविण्यात आले आहे. आपत्ती ग्रस्तांना र्आिर्थक मदतीची गरज आहे. ती शासनाकडून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरामुळे ६० कोटींचे नुकसान४१३ आॅगस्टला नागपूर शहरात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे ४१६ कुटुंब विस्थापीत झाली. ४८६ लोकांना पुरातून वाचविण्यात आले. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. मालमत्ताचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ५९.६२ कोटीचे नुकसान झाले आहे. या बाबतचा अहवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आल्याची माहिती दटके यांनी सोमवारी दिली.नुकसानग्रस्त वस्त्या४शहरातील समतानगर, कस्तुरबानगर, रिमानगर, गोदवारीनगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्यनगर, वेलेनगर, पाडुरंगनगर, काचीपुरा, सोनियानगर, वनदेवीनगर, संघर्षनगर, पांढराबोडी,भरतवाडा, हुडकेश्वर(पिपळा फाटा) गोरेवाडा, मानकापूर, गुलशननगर, विटभट्टी, अंबाझरी कॉलनी आदी वस्त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.