शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सव्वापाच वर्षांत नागपूरमध्ये आगीच्या घटनांमध्ये 431 नागरिकांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 18:21 IST

एरवी नागपूर शहरात आगीच्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटनांचे प्रमाण वाढीस लागले असल्याचे चित्र आहे

नागपूर, दि. 5 -  एरवी नागपूर शहरात आगीच्या घटना नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटनांचे प्रमाण वाढीस लागले असल्याचे चित्र आहे. गेल्या सव्वापाच वर्षांत नागपूर शहरात साडेचार हजारहून अधिक ठिकाणी आग लागली आणि या घटनांमध्ये थोडेथोडके नव्हे तर ४३१ नागरिकांचा होरपळून किंवा जीव गुदमरुन मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून आगीसंदर्भातील हे दाहक वास्तव समोर आले आहे.   उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. शहरात २००७ पासून किती आगी लागल्या, त्यांचे स्वरुप व त्यापासून झालेले नुकसान, प्राणहानी इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१७ या कालावधीत उपराजधानीमध्ये ४ हजार ८३२ आगी लागल्या. यात मोठ्या स्वरुपाच्या ७२६ तर मध्यम स्वरुपाच्या १ हजार १६६ आगींची प्रकरणे होते. २ हार ९४० ठिकाणी किरकोळ स्वरुपाची आग लागली होती. जखमींपेक्षा मृतांची संख्या अधिक या सव्वापाच वर्षांमध्ये लागलेल्या आगींच्या घटनांमध्ये ४३१ नागरिकांचा मृत्यू झाला. यात १०२ महिला तर ३२९ पुरुषांचा समावेश होता. जखमींपेक्षा मृतांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.  ५९ पुरुष तर ३५ महिला असे ९४ जण जखमी झाले.