शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

४३ टक्के उद्यानांत पिण्याचे पाणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारितील बगिच्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारितील बगिच्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. नागपुरातील तब्बल ४३.५० टक्के उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर ६५ टक्के उद्यानांत शौचालयाची सोय उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारित किती उद्याने आहेत, यापैकी किती ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे, शौचालये किती ठिकाणी आहेत, तसेच उद्यानांत किती सुरक्षारक्षक आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर शहरात मनपाच्या अखत्यारित १३१ उद्याने आहेत. यातील केवळ ४६ उद्यानांमध्ये शौचालयाची सोय आहे. तर ५७ उद्यानांमध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शहरातील अनेक उद्यानांमध्ये सकाळ, सायंकाळ मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी असते. अशा स्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे, ही आश्चर्यकारक बाब आहे.

सर्वाधिक सुविधा पॉश वस्तीतच

लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनमध्ये शहरातील पॉश भागांचा समावेश होतो. याच दोन्ही झोनमध्ये सर्वाधिक उद्यानांमध्ये पिण्याचे पाणी व शौचालयांची सोय आहे. लक्ष्मीनगरमधील एकूण १४ उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सोय असून पाच ठिकाणी शौचालये आहेत, तर धरमपेठेतील १५ उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सुविधा असून ११ ठिकाणी शौचालये बांधण्यात आली आहेत.

झोननिहाय सुविधा असलेली उद्याने

झोन : पिण्याचे पाणी : शौचालये

लक्ष्मीनगर : १४ : ५

धरमपेठ : १५ : ११

हनुमाननगर : ४ : ४

धंतोली : ७ : ४

नेहरूनगर : ३ : २

गांधीबाग : ४ : ५

सतरंजीपुरा : ६ : ६

लकडगंज : ३ : २

आशीनगर : ९ : ६

मंगळवारी : ८ : १

५१ टक्के उद्यानांत सुरक्षारक्षक नाहीत

नागपुरातील काही उद्यानांमध्ये दुपारी तसेच सायंकाळनंतर अनेक समाजकंटक येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र, मनपाने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. शहरातील ६७ म्हणजेच ५१ टक्के उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. १३१ उद्यानांसाठी ११५ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे काही उद्यानांंत तीन किंवा त्याहून अधिक सुरक्षारक्षक आहेत, तर २७ उद्यानांची सुरक्षा केवळ एकाच सुरक्षारक्षकाच्या भरवशावर आहे.