शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

४० संसार पुन्हा सावरले

By admin | Updated: July 9, 2014 01:07 IST

क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा

महिला आयोगाची सुनावणी : मतभेद दूर केलेनागपूर : क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा कुटुंबांतील मतभेद दूर करण्यात आल्याने ४० संसार पुन्हा सावरले आहेत.महिला आयोगाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुसीबेन शहा यांच्यासह सदस्या विजया बांगडे व चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली. आयोगापुढे ८५ प्रकरणे तडजोडीसाठी आली होती. यातील सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या ६६ पैकी ४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ज्या प्रकरणात समेट झाला नाही, अशी प्रकरणे ४ आॅगस्ट २०१४ च्या सुनावणीत निकाली काढली जाणार असल्याची माहिती विजया बांगडे यांनी दिली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा, यासाठी महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस स्टेशन येथील महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. परंतु समेटानतंरही अन्याय झाल्यास अशा प्रकरणात पीडित महिलेला पोलिसात तक्र ार नोंदविण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती बांगडे यांनी दिली.पीडित व अन्यायग्रस्त महिलांना आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या समस्या निकाली काढून न्याय मिळवून दिला जाईल. यासाठी महिलांनी तक्र ार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. ८५ प्रकरणांत प्रामुख्याने कौटुंबिक वादाची प्रकरणे होती. तसेच मालमत्ता, भाडेकरूचा वाद अशीही काही प्रकरणे आयोगापुढे सुनावणीसाठी आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी आशा पठाण, विभागीय महिला बाल विकास अधिकारी एम.जे. बोरखेडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.एल. रामरामे, लक्ष्मण मानकर, भागवत तांबे, प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रजनी कांबळे, विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, वरिष्ठ समुदेशक अर्जुन दांगट, ए.डी. बांदूरकर यांच्यासह पीडित महिला व गैरअर्जदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)