शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के नागपूरकरांना हृदयरोगाचा धोका

By admin | Updated: September 29, 2015 04:05 IST

उपराजधानीने स्मार्ट सिटीकडे वाटचाल केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नागपूरकरांच्या आरोग्यविषयक

नागपूर : उपराजधानीने स्मार्ट सिटीकडे वाटचाल केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नागपूरकरांच्या आरोग्यविषयक समस्यांही वाढल्या आहेत. जानेवारी २०१४ ते आॅगस्ट २०१५ दरम्यान झालेल्या एका सर्वेक्षणात १७,६४७ लोकांच्या आरोग्याची तपासणी केली असता २५ ते ४० टक्के नागपूरकरांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढल्याचे आढळून आले. या पाहणीत पुरुषांसोबतच महिलाही हृदयरोग, स्थुलता, रक्तदाब आदीने ग्रस्त असल्याचे दिसून आले. आईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी हृदयाशी मैत्री करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इंडस हेल्थ व एका खासगी रुग्णालयाकडून नुकतेच एक सर्वेक्षण झाले. यात हृदयातील रक्त वाहून नेणारी धमणी अंकुचित होण्याचे (आर्टरीज ब्लॉकेज) प्रमाण वाढल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाबाशी संबंधित हृदयाचे आजाराचे प्रमाण सर्व वयात ७ ते १० टक्क्यांने वाढले आहे. लोकांमध्ये हृदयरोग वाढण्याचे सर्वात मोठे कारण ‘तणाव’ सांगितले जात आहे. युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण गतीने वाढत आहे. या सोबतच प्रदूषण, धूम्रपान, व्यायामाचा अभाव व आहाराच्या बदललेल्या सवयी हे मुख्य कारण आहे. सर्वेक्षणानुसार १० टक्के शहरी आणि ७ टक्के ग्रामीण हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत. स्थुलतेमुळे ३५ ते ४५ टक्के लोकांना धोका निर्माण झाला आहे. तेलकट आणि चरबीयुक्त खाद्यामुळे स्थुलता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास हृदय रोगवारंवार छातीत दुखणे, अ‍ॅसिडीटी, अचानक श्वास घेताना येत असलेली अडचण या लक्षणाकडे रुग्ण दुर्लक्ष करतात. वेळीच उपचार घेत नाहीत. यामुळे भविष्यात गंभीर हृदय रोगाला सामोर जावे लागते. सर्वेक्षणात हे लक्षात आले की १५ ते २० टक्के लोकांना हृदयाचा आजार आहे हे कळल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा की ते त्यांच्यासाठी घातक आहे. यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्याचे पालन करणे आवश्यक आहे. १७,६४७ लोकांवर झालेल्या सर्वेक्षणातील तथ्य : तणाव हे सर्वात मोठे कारणधूम्रपान करणाऱ्यांना अचानक हार्ट अटॅकचा धोका सिगारेटच्या धुरात कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण बऱ्यापैकी असते. प्रदूषित हवेमधून जेवढ्या प्रमाणात हा वायू शरीरात जाऊ शकतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सिगारेटच्या धुरामुळे जातो. रक्तामध्ये प्राणवायू (आॅक्सिजन) पेक्षा हा जास्त प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे धुराबरोबर हा वायू अधिक आणि प्राणवायू कमी प्रमाणात शोषला गेल्यामुळे साहजिकच शरीरातील पेशींना आॅक्सिजन कमी मिळतो. यामुळे धमणीकाठिण्य वाढते. अशाप्रकारे नियमितपणे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अचानक हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.-डॉ. आनंद संचेती, प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सकअसे आहे सर्वेक्षणातील तथ्य ंसर्वेक्षणात ९३२१ पुरुष तर ८३२६ महिलांची तपासणी करण्यात आली.ंयात व्हिटॅमिन बी १२ ची कमी २४.२१ टक्के महिलांमध्ये तर १९.१४ टक्के पुरुषांमध्ये दिसून आली. ंउच्च रक्तदाबाची समस्या ३६.२७ पुरुषांमध्ये तर ३४.२९ टक्के महिलांमध्ये दिसून आली. ंहृदयविकार २५.२८ टक्के पुरुषांत तर २७.०८ टक्के महिलांमध्ये आढळून आला. ंहृदय रोगाचे मुख्य कारण ठरलेली स्थुलता ही पुरुषांमध्ये ३९.२८ टक्के तर ३३.२७ टक्के महिलांमध्ये दिसून आली. ंहायपरलिपेमिया (रक्तात अधिक प्रमाणात चरबी व लिपीड्स असणे) किंवा एथेरोस्क्लेरॉसिसचे प्रमाण २४.३८ टक्के पुरुषांमध्ये तर २५.३८ टक्के महिलांमध्ये दिसून आले.