शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

शिवसेनेसोबत ३०० टक्के युती होणारच : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:59 IST

आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे.

ठळक मुद्दे‘ईडी’त सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. दोन्ही पक्ष एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. मात्र सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शनिवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.दोन्ही पक्षांना युती हवी आहे. जागा वाटप हा संख्यात्मक विचार आहे. राज्य म्हणून एकत्रित विचार होईल. शक्यतो विद्यमान आमदारांच्या जागा एकमेकांना मागायच्या नाही असाच प्रयत्न राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ‘ईडी’च्या कारवाईसंदर्भात त्यांना विचारणा केली असता ती स्वायत्त संस्था आहे. त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.स्कुटरवरील लोक पाच वर्षांत शेकडो कोटींचे मालक कसे झाले ?राज ठाकरे, उन्मेष जोशी यांच्या ‘ईडी’ चौकशीवरून विरोधक सत्ताधारी भाजपला धारेवर धरताहेत. परंतु, ‘ईडी’ ही स्वतंत्र यंत्रणा असून अनेक महिने रेकी केल्यानंतरच ‘ईडी’ किंवा आयकर विभाग कारवाई करीत असतो. यामध्ये सरकार किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसतो. एखाद्या स्कूटरवर फिरणाऱ्या राजकीय नेत्याकडे फारशी मिळकत नसताना जर अचानक कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा होत असेल तर हे संशयास्पद आहे. सहाजिकच ‘ईडी’ चौकशी करणारच. यात आमचा काही राजकीय डावपेच नाही असे पाटील यांनी स्पष्ट केले.संघटन मजबुतीवर भरराज्यात भाजप संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजप संघटनेतील सदस्य संख्या ही १ कोटी ६ लाख होती. याच महिन्यात ती ५० लाखाने वाढवणार आहे. आतापर्यंत ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ धरुन ही संख्या सध्या ३२ लाख झाली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.पत्रकार, वकिलांसाठी ‘स्टायपंड’वकील आणि पत्रकार हे समाजाचा आधारस्तंभ असून त्यांच्यातील स्वाभिमान कायम राहिला पाहिजे. म्हणून या पेशात नव्याने येणाऱ्या लोकांना पहिली ३ वर्षे ‘स्टायपंड’ देण्याचा शासनाचा मानस आहे. आमचे सरकार पुन्हा निवडून आल्यास याबाबत गांभीर्याने निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMediaमाध्यमे