शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

२,६२८ बाधित, २८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ...

सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग दुपटीने वाढला आहे. गुरुवारी तेरा तालुक्यांत २,६२८ रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला.

सावनेर तालुक्यात पहिल्यांदाच ४४६ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १८३, तर ग्रामीण भागात २६३ रुग्णांची भर पडली.

काटोल तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे. तालुक्यात ७४५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २४० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ८५, तर ग्रामीण भागातील १५५ रुग्णांचा समावेश आहे.

कुही तालुक्यात ८९ रुग्णांची भर पडली. मांढळ व नवेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे २१, मांढळ (२४), वेलतूर (३८), साळवा (४), तर तितूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील सोनपुरी गाव कोरोना हाटस्पॉट ठरले आहे. २२५ लोकसंख्या असलेल्या या गावात बाधितांची संख्या ६१ इतकी आहे.

उमरेड तालुक्यात ७६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात १६९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर- ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील १८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १५१ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात ४७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५०, तर शहरातील ७८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत २६, मेंढला (३), जलालखेडा (४), तर मोवाड येथे ५ रुग्णांची नोंद झाली. मौदा तालुक्यात ५५ रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १४७० इतकी झाली आहे. यात ९७४ रुग्ण कोरोेनामुक्त झाले. सध्या ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगण्यात ग्राफ वाढला

हिंगणा तालुक्यात १३७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६८ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील मृत्यूसंख्या १४५ इतकी झाली आहे. गुरुवारी वानाडोंगरी येथे ९२, डिगडोह (४५), हिंगणा (१७), इसासनी (१७), टाकळघाट (३), निलडोह (२८), गुमगाव (१२), शिवमडका (१०), भारकस (८), रायपूर (४), कान्होलीबारा (५), वागधरा (२), ऐरणगाव (७), अडेगाव (४) शिरुळ (३), जुनेवानी २, तर धानोली, कवडस, आमगाव, उमरीवाघ, मोंढा, देवळी सावंगी, नागलवाडी, गौराळा, मेटाउमरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.