शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २४२६ चिमुकल्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

सुमेध वाघमारे नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन योजना आखून त्यावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे, असे असतानाही मृत्यूदर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन योजना आखून त्यावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे, असे असतानाही मृत्यूदर रोखण्यात हवे तसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता तर कोरोनाच्या नावाखाली या योजनांनाच ग्रहण लागल्याने पूर्व विदर्भात शिशू मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.

शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ रुग्णवाहिकेची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा व मानव विकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो. त्यानंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

-योजनेतील मनुष्यबळ कोरोना प्रतिबंधाच्या कार्यात

आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी असलेल्या योजनांमधील काही डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची ड्युटी ‘कोविड केअर सेंटर, ‘कोविड हेल्थ सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र व ‘ट्रेसिंग’च्या कार्यात लावली आहे. यामुळे प्रभावीपणे योजना राबविणे शक्य नाही.

-कमी न होता, पाच वर्षांत वाढले शिशू मृत्यू

२०१४-१५मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात २०६६ शिशूमृत्यूंची नोंद होती. यात भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्ह्यात १७४ मृत्यू होते. परंतु, मागील पाच वर्षांत ही संख्या कमी न होता उलट वाढली. २०२०-२१ मध्ये २४२६ मृत्यूची नोंद झाली. यात भंडाऱ्यात २३७, गोंदियात २८८, चंद्रपूरमध्ये ४७४, गडचिरोलीत ३७६, वर्धेत १६५ तर नागपूर जिल्ह्यात नागपूर ८८६ मृत्यू झाले.

-२०२०-२१ या वर्षात शून्य ते एक या वयोगटातील मृत्यू

जिल्हा : मृत्यू

नागपूर : ८८६

भंडारा : २३७

चंद्रपूर : ४७४

गडचिरोली : ३७६

गोंदिया : २८८

वर्धा : १६५

- हा ‘सिस्टम’चा दोष

श्रीलंका व बांगलादेशाच्या तुलनेत भारताचा बालमृत्यूदर अधिक आहे. केरळचा तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर जास्त आहे. याचा अभ्यास करणाऱ्या व उपाययोजना करणाऱ्या सिस्टमचा हा दोष आहे. बालमृत्यू रोखणे हा खर्चीक कार्यक्रम नाही. ‘सिस्टम’ने योग्य पद्धतीने काम केल्यास व आजाराच्या लक्षणांची व उपाययोजनांची घराघरात माहिती पोहोचविल्यास मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य आहे.

-डॉ. सतीश देवपुजारी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ