शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

२२ बेलगाम स्कूल बसेस जप्त

By admin | Updated: November 28, 2014 00:58 IST

गतीवर नियंत्रण मिळवून वाढते अपघात रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविण्यात आले. परंतु अनेक बसमालकांनी वेग नियंत्रकामध्ये छेडछाड

आरटीओची कारवाई : २६ बसेसना नोटीसनागपूर : गतीवर नियंत्रण मिळवून वाढते अपघात रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर (वेग नियंत्रक) बसविण्यात आले. परंतु अनेक बसमालकांनी वेग नियंत्रकामध्ये छेडछाड करून वेग मर्यादा वाढविली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेल्या या बेलगाम स्कूल बसेसवर आज गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने पुन्हा कारवाई केली. २६ स्कूल बसेसना नोटीस बजावत २२ स्कूलबसेस जप्त केल्या. ‘लोकमत’ने नुकतेच ‘नागपुरातील ३८८ स्कूल बसेस बेलगाम’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आरटीओने ही कारवाई केली आहे.महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार (स्कूल बस) नियम २०११ मधील नियम १० (अठरा) नुसार महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या स्कूल बसचा वेग ४० तर हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटर प्रति तासाची मर्यादा निश्चित केली आहे. १ मे २०१२ पासून सर्व स्कूल बसना वेग नियंत्रक बसविण्याची सक्ती करण्यात आली. परंतु यामुळे बस फेऱ्या कमी झाल्या. आर्थिक फटकाही सहन करावा लागत होता, म्हणून यावर अनेकांनी नवी शक्कल लढविली. थेट वेगनियंत्रकामध्ये बदल करुन ६० ते ७० किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा वाढविली. ‘लोकमत’ने ४८८ स्कूल बसेसमधून ३८८ स्कूल बसेस नियमांची पायमल्ली करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आणली. याची दखल घेत आरीटीओ शहर कार्यालयाने ही दुसऱ्यांदा कारवाई केली. आज झालेल्या कारवाईत २२ बसेसनी आपली वेग मर्यादा वाढवून घेतल्याचे आढळून आले. या बसेसला जप्त करून इतर २६ बसेसना नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.(प्रतिनिधी)