शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नागपुरातील २०१५ पर्यंतचे ले-आऊट होणार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:35 IST

राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘एनएमआरडीए’तील दीड लाख प्लॉटधारकांना दिलासा ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या प्लॉटला संरक्षण, रियल इस्टेटला बूस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास दीड लाख प्लॉटधारकांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना पालकमंत्री बोलत होते. त्यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतचे सर्व ले-आऊट नियमित करण्यात येणार आहे. यासाठी प्लॉटधारकांना एनएमआरडीएच्या विकास शुल्कासह १५ टक्के कम्पाऊंडिंग शुल्कही भरावे लागेल. यामुळे सर्वांसाठी घर या योजनेलाही गती मिळेल.सन २००० नंतर शहरात ले-आऊटने मोठा जोर पकडला. वर्धा रोडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ले-आऊट विकसित झाले. याशिवाय हिंगणा रोड, कामठी रोड, अमरावती रोड आणि भंडारा रोडलगत मोठ्या प्रमाणावर ले-आऊट टाकण्यात आले. दरम्यान, काही डेव्हलपर्सनी ले-आऊट विकसित न करताच प्लॉट विकून टाकले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, सरकारने रजिस्ट्रीवरच बंदी आणली. अशा परिस्थितीत शहरातील लाखो लोकांनी प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही ते फसवल्या गेल्याचे समजू लागले होते. अशा लोकांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता ते विकास शुल्क भरून आपला प्लॉट नियमित करू शकतील. या निर्णयाचा लाभ तब्बल दीड लाख लोकांना मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु हा आकडा खूप मोठा होऊ शकतो. कारण डीपी प्लानला मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या आपत्ती व सूचनांमध्ये तब्बल पाच हजारापेक्षा अधिक आपत्ती आल्या होत्या. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, जिल्ह्यात पाच हजारापेक्षा अधिक संपत्ती अडकलेल्या आहेत. या निर्णयामुळे या प्लॉटची खरेदी-विक्री करणे शक्य होईल. यामुळे मंदीत असलेल्या रियल इस्टेट व्यवसायालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 बिना-भालेगावचे पुनर्वसन पालकमंत्री बावकुळे यांनी सांगितले की, वेकोलिच्या खाणीमुळे प्रभावित झालेल्या मौदा तालुक्यातील बिना व भालेगाव या दोन गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी महाजेनको १२२ कोटी व वेकोलि ४४ कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. या कामासाठी एनएमआरडीएला नोडल एजन्सी बनवण्यात आले आहे.कापूस बियाण्यांची गुणवत्ता तपासणीसाठी समिती  बावनकुळे यांनी सांगितले की, कापूस बियाण्यांपासून उत्पादन मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मिळत आहेत. परंतु अधिकारी मात्र ही गोष्ट नाकारत आहेत. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, जे जाणून घेण्याच्या उद्देशाने कापूस बियाणांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर यांच्या नेतृत्वात ही समिती गठित करण्यात आली आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे