शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

२ हजाराच्या नोटा चलनात दिसेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST

शरद मिरे: भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली ...

शरद मिरे:

भिवापूर : नोटाबंदीनंतर चलनातील १ हजार व पाचशे रुपयांची नोट बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने सामान्यांच्या हातात थोपविलेली २ हजार रुपयाची नोट आता मात्र दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे चलनातील सर्वात मोठी नोट गेली कुठे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. हा धक्का सामान्य नागरिकांपेक्षा गर्भ श्रीमंतांसाठी मोठा होता. मात्र त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाच अधिक झाला. या नोटाबंदीत हजार व पाचशे रुपयाची नोट चलनातून बाद केल्यानंतर त्याची उणीव भरून काढण्याकरीता रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून २ हजार व ५०० रुपयाची नोट नविन डिझाईनसह बाजारात आणली. त्यानंतर काही दिवसांनी २०० रुपयांची नोट सुध्दा आली. दरम्यान, नव्याने आलेल्या या तिन्ही नोटा दैनिक व्यवहाराच्या माध्यमातून बँकेत व बाजाराममध्ये वर्ष दोन वर्षे सर्वांच्या दृष्टीस पडल्या. मात्र गत वर्षभरापासून यातील २ हजार रुपयाची नोट सामान्य नागरिकांच्या डोळ्याला दिसणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या संख्येत आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नेमक्या गेल्यात कुठे? हा प्रश्नच आहे. भिवापूर शहरात दोन राष्ट्रीयीकृत व एक को-ऑपरेटिव्ह बँक आहे. तालुक्यातील नागरिकांचे येथे सेव्हिंग खाते तर व्यापाऱ्यांचे करंट खाते आहे. येथे ग्राहकांकडून २ हजार रुपयांची नोट फारच कमी प्रमाणात येत असल्याचे सांगण्यात आले. तर‌ सामान्य ग्राहक व व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता गत वर्षभरापासून बाजारात २ हजार रुपयांची नोट दिसत नसल्याचे सांगितले. शिवाय बँकेतून सुध्दा पाचशे व दोनशे रुपयांची नोटच मिळत असल्याचे सांगण्यात आले. शहरात को-ऑपरेटिव्ह व पतसंस्थेचे अनेक दैनिक अभिकर्ते दैनिक कलेक्शनचे काम करतात. त्यांनासुध्दा गत वर्षभरापासून २ हजार रुपयांच्या नोटेचे दर्शन झालेले नाही. एकंदरीत मोठ्या देवाणघेवाणीतसुध्दा ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटेचा अधिक वापर होत आहे. तर किरकोळ देवाणघेवाणीत १००, ५०, २०, १० रुपयांची नोट दिसत आहे. अचानक दर्शन दुर्लभ झालेल्या २ हजार रुपयांच्या नोटेवरून सामान्य नागरिकांसह आर्थिक उलाढाल करणाऱ्या बँकाही आता यावर चिंतन करत आहे.

---

उद्देशालाच हरताळ फासला

वर्षानुवर्ष दडवून ठेवलेला ''''ब्लॅक मनी'''' बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केल्याचे सांगण्यात आले. काहीअंशी ते खरे ही असले तरी, त्यानंतर चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट अशी अचानक दिसेनाशी झाल्यामुळे नोटाबंदीच्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसते. २ हजार रुपयांच्या नोटा अनेकांनी दडवून ठेवल्यामुळेच तुटवडा निर्माण झाल्याचे आता बोलल्या जात आहे.

चलनातील सर्वात मोठी २ हजार रुपयांची नोट अशी अचानक गायब होणे म्हणजे ज्या उद्देशासाठी नोटाबंदी करण्यात आली. तो उद्देश फसल्याचे स्पष्ट होते. पूर्वीप्रमाणेच नोटाबंदीनंतर अनेकांनी या नोटा दडवून ठेवल्याचा संशय त्यामुळे बळावताे आहे. याकडे रिझर्व्ह बँकेने व केंद्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे.

- प्रमोद रघुशे, संचालक विद्यानिकेतन, भिवापूर