शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

 नागपुरात १७० धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:57 IST

dangerous buildings नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत.

ठळक मुद्देपावसाळा आला की नोटीस : हजारो लोकांचा जीव धाेक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत. अशा इमारतींचे मालक इमारतींची दुरुस्ती केल्याचा दावा करतात. यात सर्वाधिक ९७ जीर्ण इमारती गांधीबाग भागात आहे. नेहरूनगर झोन क्षेत्रात ५० हून अधिक अशा इमारती आहेत. यातील काही इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत. परंतु, नाइलाज असल्याने येथे शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत.

जीर्ण इमारती संदर्भाने प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विभागीय कार्यालयांनी मालकांना जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नाही. अशा अति धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा व वीज खंडित करावी अशी सूचना प्रशासनाने संबंधित विभागांना केली आहे.

दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

जीर्ण इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस बजावल्या जातात. यातील काही मालकांनी इमारतींची दुरुस्ती केली. परंतु, अजूनही अनेक इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडून दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्याय नसल्याने वास्तव्य

इमारत जीर्ण झाली. दुरुस्तीची गरज आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. परंतु, इमारत दुरुस्त करण्यासाठी पैसा नाही. आर्थिक अडचणीमुळे जीव धोक्यात घालून नाइलाजाने येथे राहावे लागते, अशी प्रतिक्रिया या इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दिली.

मनपाकडून धोकादायक इमारतींचा सर्वे

दोन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला. यात तीन दशकांपूर्वी बांधलेल्या २० हजारांहून अधिक इमारती आहेत, तर सहा दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची संख्या चार हजारांहून अधिक आहे.

मनपा कायद्याच्या कलम २६५ नुसार जीर्ण इमारत दुरुस्तीची जबाबदारी ही घर मालकांची आहे.

९३ इमारत मालकांना नोटीस

नागपूर शहरातील १७० धोकादायक इमारतीपैकी ९३ इमारती अतिधोकादायक असल्याने गेल्या वर्षी या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी झोन कार्यालयाकडून धोकादायक इमारतींना दरवर्षी नोटीस बजावली जाते. परंतु, यातील बहुसंख्य इमारतीवर कारवाई झालेली नाही. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका