शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

१७० धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत. अशा इमारतींचे मालक इमारतींची दुरुस्ती केल्याचा दावा करतात. यात सर्वाधिक ९७ जीर्ण इमारती गांधीबाग भागात आहे. नेहरूनगर झोन क्षेत्रात ५० हून अधिक अशा इमारती आहेत. यातील काही इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत. परंतु, नाइलाज असल्याने येथे शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत.

जीर्ण इमारती संदर्भाने प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विभागीय कार्यालयांनी मालकांना जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नाही. अशा अति धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा व वीज खंडित करावी अशी सूचना प्रशासनाने संबंधित विभागांना केली आहे.

....

दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

जीर्ण इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस बजावल्या जातात. यातील काही मालकांनी इमारतींची दुरुस्ती केली. परंतु, अजूनही अनेक इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडून दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

पर्याय नसल्याने वास्तव्य

इमारत जीर्ण झाली. दुरुस्तीची गरज आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. परंतु, इमारत दुरुस्त करण्यासाठी पैसा नाही. आर्थिक अडचणीमुळे जीव धोक्यात घालून नाइलाजाने येथे राहावे लागते, अशी प्रतिक्रिया या इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दिली.

....

मनपाकडून धोकादायक इमारतींचा सर्वे

दोन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला. यात तीन दशकांपूर्वी बांधलेल्या २० हजारांहून अधिक इमारती आहेत, तर सहा दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची संख्या चार हजारांहून अधिक आहे.

मनपा कायद्याच्या कलम २६५ नुसार जीर्ण इमारत दुरुस्तीची जबाबदारी ही घर मालकांची आहे.

....

९३ इमारत मालकांना नोटीस

नागपूर शहरातील १७० धोकादायक इमारतीपैकी ९३ इमारती अतिधोकादायक असल्याने गेल्या वर्षी या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी झोन कार्यालयाकडून धोकादायक इमारतींना दरवर्षी नोटीस बजावली जाते. परंतु, यातील बहुसंख्य इमारतीवर कारवाई झालेली नाही. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.