शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

१७० धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात तीनशेहून अधिक जीर्ण इमारती आहेत. यातील जवळपास १७० इमारती अजूनही वापरात आहेत. अशा इमारतींचे मालक इमारतींची दुरुस्ती केल्याचा दावा करतात. यात सर्वाधिक ९७ जीर्ण इमारती गांधीबाग भागात आहे. नेहरूनगर झोन क्षेत्रात ५० हून अधिक अशा इमारती आहेत. यातील काही इमारती राहण्यासाठी धोकादायक आहेत. परंतु, नाइलाज असल्याने येथे शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत.

जीर्ण इमारती संदर्भाने प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. विभागीय कार्यालयांनी मालकांना जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात आहेत, अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. यातील काही इमारती दुरुस्त करण्याजोग्या नसल्याने त्या पाडण्याशिवाय पर्याय नाही. अशा अति धोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा व वीज खंडित करावी अशी सूचना प्रशासनाने संबंधित विभागांना केली आहे.

....

दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

जीर्ण इमारत मालकांना वेळोवेळी नोटीस बजावल्या जातात. यातील काही मालकांनी इमारतींची दुरुस्ती केली. परंतु, अजूनही अनेक इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडून दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

पर्याय नसल्याने वास्तव्य

इमारत जीर्ण झाली. दुरुस्तीची गरज आहे. अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. परंतु, इमारत दुरुस्त करण्यासाठी पैसा नाही. आर्थिक अडचणीमुळे जीव धोक्यात घालून नाइलाजाने येथे राहावे लागते, अशी प्रतिक्रिया या इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दिली.

....

मनपाकडून धोकादायक इमारतींचा सर्वे

दोन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला. यात तीन दशकांपूर्वी बांधलेल्या २० हजारांहून अधिक इमारती आहेत, तर सहा दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींची संख्या चार हजारांहून अधिक आहे.

मनपा कायद्याच्या कलम २६५ नुसार जीर्ण इमारत दुरुस्तीची जबाबदारी ही घर मालकांची आहे.

....

९३ इमारत मालकांना नोटीस

नागपूर शहरातील १७० धोकादायक इमारतीपैकी ९३ इमारती अतिधोकादायक असल्याने गेल्या वर्षी या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी झोन कार्यालयाकडून धोकादायक इमारतींना दरवर्षी नोटीस बजावली जाते. परंतु, यातील बहुसंख्य इमारतीवर कारवाई झालेली नाही. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.